• Mon. Mar 9th, 2026
    Jalgaon News : माजी उपसरपंचाच्या हत्येने जळगाव हादरले, पोलिसांनी एका संशयिताला हेरले; तपासाला वेग येणार?

    Jalgaon Sarpach Murder Case Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे प्रकरण सध्या महाराष्ट्रात गाजत असतानाच त्याची पुनरावृत्ती जळगाव जिल्ह्यात घडली आहे. शिंदे गटाच्या एका माजी उपसरपंचाला दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करत संपवण्यात आले. याप्रकरणी एका संशयितांला अटक करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    निलेश पाटील, जळगाव : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे प्रकरण सध्या महाराष्ट्रात गाजत असतानाच त्याची पुनरावृत्ती जळगाव जिल्ह्यात घडली आहे. शिंदे गटाच्या एका माजी उपसरपंचाला दिवसाढवळ्या शेतात काम करीत असताना आई-वडिलांच्या डोळ्यासमोर धारदार हत्याराने वार करत हत्या करण्यात आली. या हत्येने जळगाव हादरलं आहे. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

    जळगाव तालुक्यातील कानसवाडा शिवारातील शेतात माजी उपसरपंच युवराज कोळी यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरित दोन जणांच्या मागावर पोलीस पथक रवाना झाले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉमहेश्वर रेड्डी यांनी दिली.
    Jalgaon News: आधी बीड आता जळगाव; अज्ञातांकडून शिंदेंच्या माजी उपसरपंचाची हत्या, गावकऱ्यांसमोरच संपवलं
    युवराज सोपान कोळी वय-३५, रा. भादली ता.जळगाव असे मृत उपसरपंचाचे नाव आहे. ते आपल्या आई-वडील, पत्नी आणि तीन मुलांसह भादली गावात वास्तव्याला होते. ३१ डिसेंबर रोजी युवराज कोळी यांचा भरत पाटील, देवा पाटील, हरीश पाटील या तिघांसोबत ढाब्यावर वाद झालेला होता. त्यानंतर याच कारणावरून गुरुवारी २० मार्लाच रात्री १० वाजता युवराज कोळी आणि भरत पाटील यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद रात्री नातेवाईकांच्या मदतीने मिटवण्यात आला होता.

    त्यानंतर शुक्रवारी २१ मार्चला सकाळी ८ वाजेच्या सुमारास युवराज हे त्यांच्या आई-वडिलांसोबत कानसवाडा शिवारातील शेतात काम करत होते. त्यावेळी संशयित आरोपी भरत पाटील आणि त्याच्यासोबत असलेले देवा पाटील, हरिश पाटील यांनी येऊन धारदार चाकू आणि चॉपरने युवराज कोळी यांच्यावर वार केले.

    दरम्यान छातीवर केलेल्या गंभीर जखमी झाल्याने युवराज जागेवरच कोसळले. त्यांना् वाचवण्यासाठी त्यांचे वडील सोपान कोळी आणि आई यांनी देखील धाव घेतली. परंतु देवा आणि हरीश या दोघांनी दोघांना पकडून ठेवले होते. आई-वड़िलांच्या डोळ्यासमोर मुलाचा हा खून करण्यात आला होता.

    परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत भरत पाटील, देवा पाटील आणि हरीश पाटील हे मारेकरी पसार झाले होते. युवराज कोळींना खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. मुलाच्या मृत्यूची वार्ता ऐकताच आई आणि वडिलांनी टाहो फोडला. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगी यांनी देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.

    युवराज कोळी हे शिंदे गटाचे कार्यकर्ते असून कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच होते. कार्यकर्त्याचा खून झाल्याचे कळल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन नातेवाईकांची भेट घेऊन कुट्ंबाचे सांत्वन केले. दरम्यान यासंदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यार्च काम सुरू आहे. यागुन्ह्यातील संशयित आरोपी भरत पाटील याला अटक करण्यात आली आहे तर अन्य दोघांचा शोध घेणे सुरू आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed