• Sat. Mar 7th, 2026
    ‘Aaditya Thacketay, Dino Morea दिशा सालियनच्या फ्लॅटवर दोन ते तीन तास होते’, वकिलाचा खळबळजनक दावा

    Satish Salian Lawyer on Aaditya Thackeray : “एनसीबीच्याच अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली आहे. ते सगळं आम्ही मेन्शन केलं आहे. त्या डेटामध्ये आदित्य ठाकरे, दिनो मौर्या हे सर्व दिशा सालियनच्या फ्लॅटवर दोन ते तीन तास होते अशा माहितीपासून ते काही सिक्रेट गोष्टीदेखील समोर आल्या आहेत, ज्यामुळे आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक होऊ शकते. व्हायलाच पाहिजे”, असा दावा वकील निलेश ओझा यांनी केला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनीदेखील या प्रकरणात आदित्य ठाकरे, सूरज पांचोल, दिनो मौर्या यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. दिशा सालियनचा मृत्यू झाला त्यादिवशी आदित्य ठाकरे, दिनो मौर्या आणि इतर जण तिच्या फ्लॅटवर दोन ते तीन तास होते, अशा खळबळजनक दावा सतीश सालियन यांच्या वकिलांनी केला आहे.

    वकील निलेश ओझा यांचा नेमका दावा काय?

    “या प्रकरणात आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतर यांच्याविरोधात गँगरेप आणि हत्या या कलमाखाली गुन्हे दाखल करावेत. या सर्वांची पोलीस कोठडी घ्यावी यावी. त्यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी. या प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. आरोपींचा दबदबा चालणार नाही, निष्पक्ष कारवाई होऊ शकते अशा ठिकाणी ते प्रकरण ट्रान्सफर केलं जावं. ही देखील एक मागणी आहे”, अशी भूमिका निलेश ओझा यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या प्रतिक्रियेत मांडली आहे.

    “याचिकाकर्त्यांना, वकिलांना, साक्षीदारांसह अधिकारी समीर वानखेडे यांनादेखील पोलीस संरक्षण देण्यात यावं. कारण त्यांच्याकडे पुष्कळ डेटा आहे. त्याबाबत एनसीबीच्याच अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली आहे. ते सगळं आम्ही मेन्शन केलं आहे. त्या डेटामध्ये आदित्य ठाकरे, दिनो मौर्या हे सर्व दिशा सालियनच्या फ्लॅटवर दोन ते तीन तास होते अशा माहितीपासून ते काही सिक्रेट गोष्टीदेखील समोर आल्या आहेत, ज्यामुळे आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक होऊ शकते. व्हायलाच पाहिजे”, असा दावा वकील निलेश ओझा यांनी केला.

    “हा प्रश्न आरोपींच्या दलालांकडून पेरुन ठेवला आहे. अडीच वर्षांआधी गुंडांचं राज्य होतं. त्या काळात दुसऱ्यांच्या मुलींवर अत्याचार करायचे, त्यांची हत्या करायची, महिलांना हरामखोर म्हणायचं, ज्याने आवाज उचलला त्याला मारायचे, कुणाचे घर तोडायचे, अर्नब गोस्वामीला जेलमध्ये टाकायचं हे सगळे काम ह्यांची कामे चालू होते. कुणी समोर यायला तयार नव्हतं”, असा घणाघात वकिलांनी केला.
    Uddhav Thacketay : ‘…तर सगळ्यांचीच पंचायत होईल’, दिशा सालियन प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा महायुतीला मोठा इशारा
    “किशोरी पेडणेकर आणि आणखी काही लोकांनी सतीश सालियन यांच्या घरी जावून दबाव आणला. पोलीस तिथे जावून त्यांना स्क्रिप्ट देतात आणि मीडियाला बोलू नका असं सांगतात. त्यानंतर केस क्लोज झाली सांगितलं. पण सरकार बदलल्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली. त्यानंतर एसआयटीची घोषणा झाला. 11 डिसेंबर 2023 ला एसआयटीची स्थापना झाली. त्यानंतर 12 जानेवारी 2024 ला पुराव्यासह आरोपीचं नाव लिहून लेखी तक्रार करण्यात आली. त्यात आदित्य ठाकरे यांचं नाव होतं. एसआयटीने आम्हाला रितसर पत्र दिलं की, हो तुमची तक्रार आम्ही एसआयटीच्या तपासात घेतली आहे”, असं वकील म्हणाले.

    “एसआयटीवाले आम्हाला मुर्ख समजतात किंवा जनतेलाही मुर्ख समजतात. जेव्हा दखलपात्र गुन्हा त्यातही बलात्कार आणि हत्येच्या घटनेत आधी गुन्हा नोंद करावा लागतो. मग तपास करावा लागतो. खरं असेल तर आरोपींवर कारवाई, खोटं असेल तर आमच्यावर कारवाई झाली असती”, असा दावा वकील निलेश ओझा यांनी केला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed