Nagpur Violence : नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावर भाजप नेत्याने खळबळजनक दावा केला असून दंगलीचा मुख्य सुत्रधार फईम खानचं बांगलादेश, मालेगावशी कनेक्शन असल्याचा दावा केला आहे.
गेला काही दिवसांपासून देशात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलं आहे. महायुतीच्या घटक पक्षातील नेते रोज खळबळजनक विधान करत आहेत. तसंच बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनानंतर नागपूरमध्ये हिंसाचार उसळला. यामध्ये अनेक नागरिकांच्या वाहनांचं, घरांचं नुकसान झालं. तसंच कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना गंभीर इजा झाल्या.
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरचा अटकेचा मार्ग मोकळा, सरकारी वकिलांची महत्त्वाची माहिती; एका केसचा दाखला देत म्हणाले…
दरम्यान, ही घटना भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर होते. त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा सूत्रधार फईम खान हा आहे. याच फईम खानचं मालेगाव, बांगलादेशशी देखील कनेक्शन आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हा फईम मालेगावला जात होता. त्याने स्वतःच्या कार्यालयचं उद्घाटन देखील केलं. मालेगाव येथील व्होट जिहाद फंडिंग घोटाळा मी बाहेर काढला होता त्यांचे पैसे संघटनेकडे गेले असल्याचं सोमय्या म्हणाले.
Nagpur News : कायदा हातात घेऊ नका, सायबर टीम लक्ष ठेवून, अफवा पसरवल्यास कारवाई होणार; नागपूर राड्यावर पोलिसांची प्रतिक्रिया
पुढे बोलताना सोमय्या म्हणाले की, नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला त्यासाठी जो सोशल मीडियावर मेसेज आला तो मेसेज बांगलादेश येथून आला होता. यामुळे मी नागपूर, मालेगाव पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, या प्रकरणात एनआयए आणि त्यासारख्या संस्थांच्या माध्यमातून चौकशी करून या प्रकरणातील कांड बाहेर काढावे.
Nagpur News : नागपूर हिंसाचाराचा मेसेज बांगलादेशातून आला, फईम खानचं मालेगावशीही कनेक्शन; भाजप नेत्याना मोठा दावा
दिशा सालीयन प्रकरणात आरोप झालेल्यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल
दिशा सालीयनच्या वडिलांना न्याय मिळत नाही. न्याय मागण्यासाठी त्यांना न्यायालयात जावं लागत आहे. न्यायालयाने जो आदेश दिला तो सर्वांना पाळावा लागेल मात्र मुलीच्या वडिलांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांना देखील स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे, मग त्यामध्ये ठाकरे असो किंवा इतर कोणीही असू दे त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल, असंही ते म्हणाले.

