• Sat. Mar 7th, 2026

    पुरावे होते तर का दिले नाही? हा प्रश्न विचारताच नितेश राणे पत्रकारांवरच भडकले, पहिल्यादाच सांगितलं खरं कारण

    पुरावे होते तर का दिले नाही? हा प्रश्न विचारताच नितेश राणे पत्रकारांवरच भडकले, पहिल्यादाच सांगितलं खरं कारण

    Nitesh Rane on Disha Salian case : मुंबई विधानसभेत दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी आपल्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला. महायुतीच्या आमदारांनी या प्रकरणामध्ये ज्या तिघांची नावे घेतलीत त्यांच्या अटकेसह चौकशीची मागणी केली आहे. मंत्री नितेश राणे यांनी यावर आपली प्रतिक्रिया देतानी याआधी पुरावे होते ते दिले नाही याबाबतची माहिती दिली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून विधानसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी याचिका दाखल करत आपल्या मुलीची हत्या झाल्याचा दावा केला. या प्रकरणावरून सभागृहात सत्ताधारी आमदारांनी तिघांना अटक करून त्यांच्या चौकशीची मागणी केली. याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनीही नाव न घेता थेट अटकेची मागणी केली आहे.

    महायुतीच्या आमदारांनी मागणी केली आहे की, सुप्रिम कोर्टच्या आदेशानुसार कोणत्याही माता भगिणी कोणावर बलात्काराचा आरोप करतात त्यांना तात्काळ अटक करून कारवाई करावी असं कोर्टाचं जजमेंट आहे. राज्यामध्ये सर्वांना एकच न्याय लागतो मग दिशा सालियान प्रकरणात तिचे वडील सतीश सालिया यांनी ज्यांची नावं मुलीच्या प्रकरणाच ज्या तिघांची नाव घेतलीत, त्यामुळे इतर लोकांना जो न्याय लागतो तोच न्याय या तिघांनाही लागावा अशी मागणी सभागृहात केली. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सकारात्मक पद्धतीने सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठिशी घालणार नाही आणि राजकीय दबाव सहन करणार नाही अशी भूमिका नोंदवली असल्याचं नितेश राणेंनी केलं आहे.

    एसआयटीने समन्स बजावलं होतं की या प्रकरणाची माहिती द्यावी यावर बोलताना नितेश राणे हे पत्रकारांवर भडकले. एसआयटीमध्ये चिमाजी आढाव नावाचा अधिकारी होता. या केसमध्ये तो सहभागी होता, आमच्याकडे महिती आहे की या केसमध्ये कव्हरअप करण्यामध्ये मदत करत होता. त्यावेळी मी पत्र लिहिलं होतं की ज्याच्यावर आम्हाला संशय आहे त्याच्यासमोरच आमचे पुरावे द्यावी का, जेणेकरून तो आरोपीला पुरावे देऊन टाकणार, असं नितेश राणे यांनी सांगितलं.

    कोणावरही विनयभंग आणि बलात्काराचा आरोप झाल्यावर त्यांना अटक करून चौकशी करावी लागते असं जजमेंट आहे. अन्य लोकांना जो न्याय तोच न्याय इतरांना असला पाहिजे. मग तो माजी मंत्री असू किंवा इतर कोणी, असंही राणे म्हणाले. यावर आदित्य ठाकरे यांनी आपली थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या पाच वर्षांपासून बदनामी प्रयत्न सातत्याने सुरु आहे. कोर्टात आहे कोर्टात बोलू, कोर्टात उत्तर देऊ, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed