• Fri. Mar 6th, 2026
    परभणी देशाच्या बाहेर आहे का? ठाकरेंचें शिलेदार विधानसभेत आक्रमक, अन्यायाचा वाचला पाढा

    MLA Rahul Patil on Parbhani Issue- परभणीसंबंधी अनेक प्रश्न मांडत असताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी परभणी देशाच्या बाहेर आहे का असा सवाल विधानसभेत केला.

    Lipi

    धनाजी चव्हाण, मुंबई: परभणी शहर महानगरपालिकेसाठी 2019 मध्ये समांतर पाणीपुरवठा योजना मंजूर झाली पण अद्यापही या योजनेला निधी मात्र देण्यात आलेला नाही. साध्या नगरपालिकेमध्ये अंडरग्राउंड ड्रेसची योजना पूर्ण झाली आहे पण परभणी सारख्या महापालिकेमध्ये मात्र ही योजना अद्याप सुरू देखील झाली नाही. परभणीच्या विविध योजनांसाठी लागणाऱ्या निधी शासनाकडून देण्यात येत नाही मग परभणी जिल्हा हा भारतात नाही का? परभणी जिल्ह्यात राहणारी लोक बाहेरची आहेत का असा सवाल उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सरकारवर कडाडून टीका केली.

    महाराष्ट्र राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सरकारच्या निर्णय क्षमतेवर कडाडून विरोध केला. सतत परभणी जिल्ह्यावर दुजाभाव दाखवला जात आहे. कधी योजना मंजूर केल्या जातात तर त्यासाठी निधी दिला जात नाही तर कधी योजनाच मंजूर केली जात नाही अशी परिस्थिती आहे असे म्हणत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी परभणी शहरासह जिल्ह्यावर किती अन्याय झाला याचा पाढाच वाचला.

    परभणी शहरात महाविकास आघाडी सरकारच्या काळात भव्य असे नाट्यगृह मंजूर करण्यात आले होते पण या नाट्यगृहाला अद्यापही सरकार निधीची तरतूद करत नाही. अर्बन कम्युनिटी सेंटर देखील याच महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झाले होते त्यासाठी चार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता होती पण तो निधी देखील शासनाने दिला नाही. जिल्ह्यात न्यायव्यवस्थेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे प्रचंड खटले प्रलंबित आहेत जास्तीत जास्त न्यायाधीशांची संख्या दिली पाहिजे. मागील दोन वर्षापासून जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे हे संत गतीने सुरू असलेले काम देखील लवकरात लवकर पूर्ण करावे असेही आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले .

    आबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय
    जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे त्यातच या ओबीसी विभागासाठी मुळात एकच इन्स्पेक्टरची नियुक्ती शासनाने केली आहे तो एकटा इन्स्पेक्टर जिल्हा कसा सांभाळणार तब्बल १६६४ कोटी रुपये ओबीसींच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप शासनाकडे बाकी आहे शिक्षणाचा अधिकार सर्वांनाच आहे मग ही दिरंगाई का असावा नाही आमदार राहुल पाटील यांनी उपस्थित केला.

    प्रत्येक जातीसाठी महामंडळाची स्थापना केली पण त्या महामंडळाला निधी कुठे दिला मतांच्या राजकारणासाठी सरकारने ही महामंडळ स्थापन केली आहेत का? हे महामंडळ सध्या चालू आहेत की रद्द केले आहेत हे तरी सरकार सांगेल का? महाराष्ट्रातली १२ कोटी जनता सरकारचे काम बघत आहे असे म्हणत यावेळी आमदार राहुल पाटील यांनी सरकारच्या कामावर चांगलेच ताशेरे ओढले.

    आपल्या भाषणादरम्यान दोन मंत्री बोलत होते त्यांना देखील त्यांनी मंत्री महोदय मी पोट तिडकीने बोलत आहे आपण माझा विषय गांभीर्याने घ्यावा. बारा कोटी महाराष्ट्राची जनता बघत आहे. सात लाखात कधी समाज मंदिर पूर्ण होतं का? दहा लाखात सिमेंट रस्ता पूर्ण होतो का? याचा निधी देखील वाढवला पाहिजे असे म्हणत हे सरकार सामान्य माणसाला न्याय देणार आहे का असा सवाल हे यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी उपस्थित केला.

    डॉ. धनाजी चव्हाण

    लेखकाबद्दलडॉ. धनाजी चव्हाणमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ‘ परभणी जिल्हा प्रतिनिधी’ म्हणून कार्यरत. 20 वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. दैनिक भास्कर, दैनिक झाडाझडती, न्यूज स्टेट महाराष्ट्र न्यूज चैनल असा प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; राजकीय बातम्यांमध्ये विशेष हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed