• Sun. Mar 15th, 2026
    शांतता राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका! नागपूर घटनेनंतर पोलिसांचा रूट मार्च

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Mar 2025, 8:39 am

    नागपूरच्या चिटणीस पार्क परिसरात घडलेल्या राड्यानंतर मंगळवारी पोलिसांनी रूट मार्च काढत शांततेचं आवाहन केलं. हिंसाचार झालेल्या परिसरात नागपूर पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या नेतृत्वात रूट मार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांना सुरक्षिततेचा विश्वास देण्यासाठी पोलीस प्रशासनाने ही पावले उचलली. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढण्याची अपेक्षा आहे. प्रशासनाने सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed