• Mon. Jun 15th, 2026
    हातात काठ्या आणि दगडं घेऊन वाहनांची तोडफोड, नागपुरातील हिंसाचाराचा अंगावर काटा आणणारा प्रसंग

    Nagpur News : औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादाचे तीव्र पडसाद नागपूरमध्ये उमटले आहेत. शहरातील महाल परिसरात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळून आला. या हिंसाचाराचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

    Lipi

    नागपूर : औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादाचे तीव्र पडसाद नागपूरमध्ये उमटले आहेत. शहरातील महाल परिसरात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळून आला आहे. काही समाजकंटकांनी रस्त्यावर उतरून वाहनांची तोडफोड केली, तर काही वाहनांना आग लावण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ८० जणांना ताब्यात घेतले आहे आणि संपूर्ण भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

    हिंसाचाराचा व्हिडीओ समोर

    या घटनेचे अनेक व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये काही समाजकंटक हातात काठ्या आणि दगडं घेऊन वाहनांची तोडफोड करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच, काही गुन्हेगारांनी पेट्रोल बॉम्बचा वापर करत दुचाकींना आग लावल्याचेही समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत.

    नागरिकांचे मोठे नुकसान

    या हिंसाचारात अनेक वाहनांचे नुकसान झाले असून, काही दुकाने आणि घरांवरही हल्ला झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. काही नागरिकांना किरकोळ दुखापती झाल्याचे वृत्त आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू असून, तोडफोड झालेल्या वाहनांचे आणि इतर मालमत्तेचे पंचनामे करण्यात येत आहेत. प्रशासनाने नुकसान भरपाई संदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.

    हातात काठ्या आणि दगडं घेऊन वाहनांची तोडफोड, नागपुरातील हिंसाचाराचा अंगावर काटा आणणारा प्रसंग

    पोलीस प्रशासन सतर्क

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. नागपूर पोलिसांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला असून पुढील कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरचे पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
    Nagpur Violence News: नागपुरात हिंसाचार, शहरात तणावपूर्ण शांतता, १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी, ८० जण अटकेत
    या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासन आणि स्थानिक नेत्यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही प्रशासनाने सांगितले आहे. सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी, या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. नागपूरकरांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed