• Sun. Mar 8th, 2026
    औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलं; रोहित पवार म्हणतात,  ‘एक प्रतीक म्हणून त्या कबरीला हात…’

    Rohit Pawar on Aurangzeb Kabr : औरंगजेबाची कबरी हटवण्याची मागणी जोर धरु लागली आहे. यावर आता आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. ‘एक प्रतीक म्हणून त्या कबरला हात न लावणे योग्य ठरेल,’ असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

    Lipi

    अहिल्यानगर : औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. अनेकांनी ही कबर उखडून टाकण्याची मागणी केली आहे. छावा चित्रपटातील काही सीनचा प्रभाव जनमानसात पाहायला मिळत आहे. चित्रपटात छत्रपती संभाजीराजेंना हालहाल करुन मारण्यात आल्याचा इतिहास पाहून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशातच ही औरंगजेबाची कबरी हटवण्याची मागणी जोर धरु लागली आहे. यावर आता आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. ‘एक प्रतीक म्हणून त्या कबरला हात न लावणे योग्य ठरेल,’ असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

    अहिल्यानगर येथे माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, २७ वर्षे औरंगजेबाला येथे राहून राज्य करता आलं नाही याचं प्रतीक म्हणजे औरंगजेबाची कबर आहे. ही कबर आज काढून टाकली तर भविष्यात लोक गडबड करतील. त्यामुळे एक प्रतीक म्हणून त्या कबरला हात न लावणे योग्य ठरेल, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.
    औरंगजेबाच्या कबरीजवळ बंदोबस्त वाढवला; SRPFची तुकडी, २ अधिकारी तैनात; कसून तपासणी, काय घडतंय?
    मढी कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला होता. यासंदर्भात रोहित पवारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, अशी प्रथा महाराष्ट्रात कधीच नव्हती. ठरावीक सरपंच आणि काही लोक मुद्दामून जर आपल्या संतांच्या भूमीत द्वेष पसरवत असतील तर संत आणि महामानवांचा विचार या लोकांना कळलेला नाही. तर ‘काही नेते द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत. त्यामुळे नेत्यांचं अनुकरण करण्यापेक्षा संतांचं अनुकरण करा, असा टोला आमदार रोहित पवार यांनी मढी येथील सरपंच संजय मरकड यांचं नाव न घेता लगावला आहे.

    दरम्यान, छावा चित्रपटातील संभाजी महाराजांना क्रुरपणे संपवल्याचे दृश्य पाहून औरंगजेबाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. त्यावरुन औरंगजेबाच्या कबरीचा वाद पेटला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी अनेक संघटना आणि राजकीय नेत्यांकडूनही केली जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी तर तशी भाषाही केली आहे. परिणामी औरंगजेब कबर परिसरात अनुचित प्रकार टाळण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एसआरपीएफची १ तुकडी, १५ पोलीस, २ अधिकारी तैनात केले गेले आहेत. काही पोलीस देखील साध्या वेशात बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed