• Tue. Jun 9th, 2026
    कुठे पावसाचा इशारा तर कुठे उष्णतेत वाढ, जाणून घ्या आजचा हवामान खात्याचा अंदाज

    Maharashtra Weather Forecast : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेत वाढ होत असून, हवामान खात्याने काही जिल्ह्यांना उष्णतेचा इशाराही दिला होता. पुणे, मुंबईसह अनेक जिल्ह्यात उष्णता वाढताना दिसत आहे. मात्र, काही जिल्ह्यात तापमानात घट होण्याची शक्यता देखील आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामानात मोठा बदल होताना दिसतोय. उष्णता वाढताना दिसत आहे. हेच नाही तर मार्च महिन्यात आतापर्यंत दोनदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. कोकणासह संपूर्ण राज्यात उष्णता वाढत आहे. पूर्व आणि मध्य भारतात उन्हाचा कडाका वाढला आहे. मात्र, काही राज्यांमध्ये पाऊस पडताना दिसतोय. आता आयएमडीकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय. मात्र, महाराष्ट्रात आज कोरडे वातावरण राहणार आहे. कोणत्याही लाटेचा इशारा आज हवामान खात्याकडून राज्यात देण्यात आला नाही.

    काही जिल्ह्यांमध्ये उष्णता कमी होण्याचा अंदाजा

    मुळात म्हणजे होळीनंतर उन्हाचा पारा अधिक चढतो, असे सांगितले जाते. मात्र, यंदा होळीच्या अगोदरच पारा चढला होता. येत्या तीन ते चार दिवसात मुंबई, पुणे, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णता कमी असेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. यामुळे नक्कीच थोडासा दिलासा नागरिकांना मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने तापमानात वाढ होताना बघायला मिळाले.
    Nagpur News : होळीचा सण साजरा केला अन् घरी जाताना कार दरीत कोसळली, बहीण-भावाची आयुष्यभरासाठी ताटातूटया जिल्ह्यांमध्ये राहणार आज कोरडे वातावरण

    विशेष: आज पुण्यातील नागरिकांना दिलासा मिळेल. मागील काही दिवसांपासून पुण्यातील तापमान वाढताना देखील दिसले. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, भुसावळ, नागपूर या जिल्ह्यांमध्ये कोरडे वातावरण राहिल. सोलापूरमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. सोलापूरचे तापमान काल ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास होते.

    विदर्भात उन्हाच्या झळा अधिकच

    यवतमाळमध्येही तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाजा वर्तवण्यात आलाय. मुंबईमध्येही उन्हाचा तडका वाढल्याचे चित्र बघायला मिळतंय. दुपारच्यावेळी मुंबईत उन्ह अधिक जाणवत आहे. मात्र, मुंबईमध्येही हवामान खात्याने कोणत्याही प्रकारचा अलर्ट आज दिला नाहीये. दुसरीकडे कोकणात काही ठिकाणी उष्णता वाढणार असल्याचे हवामाना खात्याने म्हटले आहे. सध्या उष्णतेमुळे उकाडा देखील जाणवताना दिसत आहे.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed