• Sat. Mar 14th, 2026

    Nitesh Rane : महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवली जाणार? मंत्री नितेश राणे यांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

    Nitesh Rane : महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवली जाणार? मंत्री नितेश राणे यांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

    Nitesh Rane on Aurangzeb Grave : महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवली जाणार असल्याचे संकेत भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. नितेश राणे यांनी याबाबत तसं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे औरंगजेबाची कबर खरंच हटवली जाणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    BJP Minister Nitesh Rane : छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. छत्रपती संभाजी महाराजांची अतिशय निर्घृणपणे हत्या करणाऱ्या या क्रूर मुघल राजाचा अंत देखील महाराष्ट्राच्या मातीत झाला होता. त्याची खुलताबाद येथे कबर आहे. ही कबर उद्ध्वस्त करण्याची मागणी काही नेतेमंडडळींकडून केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सातत्याने त्रास देणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या या क्रूर औरंगजेबाची कबरदेखील महाराष्ट्रात असू नये, अशी भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांची भूमिका आहे. नितेश राणे यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे औरंगजेबाची खुलताबाद येथील कबर हटवली जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

    नितेश राणे यांचं वक्तव्य काय?

    “औरंगजेबच्या कबरीबाबत आमच्या सरकारच्या प्रमुखांचीदेखील तीच मानसिकता आहे. आम्ही तयारीत बसलो आहोत. कबर हटवताना पत्रकारांना सांगणार नाही. आम्ही जेव्हा-जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर झालेलं अतिक्रमण हटवलं तेव्हा आधी आम्ही अतिक्रमण हटवलं मग ब्रेकिंग न्यूज दिली आहे”, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

    “मी हिंदू समाजाला विश्वास देऊ इच्छितो की औरंगजेबाच्या कबरीचा देखील करेक्ट कार्यक्रम होणार. जरुर होणार. जे निश्चित झालं आहे ते नक्की होईल. सरकारकडे 5 वर्ष आहेत. आता तर आम्ही पिचवर आलो आहोत. सेंच्युरी मारायची आहे”, असं सूचक वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.
    MNS Protest : LIC ला मराठीचं वावडं? इंग्रजी, गुजरातीला प्राधान्याचा दावा, मनसे आक्रमक, माफीनाम्याची मागणी
    “मी असं ऐकलं की, औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जितकी सुरक्षा वाढवली जाईल तितकं त्या कबरीचा कार्यक्रम करण्यात मजा येईल. आमचे पत्रकार मित्र विचारतात की, नितेश जी कबर कधी काढणार? पण ती कबर काढताना तुम्हाला सांगणार नाही. हे काय बाळाचं बारसं थोडी आहे की, तुम्हाला त्याचं नाव ठेवण्यासाठी बोलावणार”, असं नितेश राणे म्हणाले.

    “जेव्हा-जेव्हा आम्ही शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवलं तेव्हा आम्ही पत्रकारांना सकाळी 5 वाजता कॅमेरा घेऊन या असं सांगितलं का? नाही सांगितलं ना. आम्ही आधी तोडलं मग तुम्हाला ब्रेकिंग न्यूज दिली. हे लक्षात ठेवा. त्यामुळे मी हिंदू समाजाला विश्वास देतो की, आता याबाबत मी जास्त माहिती देणार नाही. मग मला पत्रकारांनी कितीही प्रश्न विचारु देत. पण जे ठरलं आहे ते निश्चित होणार. इथे स्वराज्य रक्षक शिवाजी महाराजांच्या आठवणी हव्यात, स्वराज्याचे विचार महाराष्ट्रात हवेत. आम्हाला अशी घाण नको, औरंगजेब टीपू सुल्तान सारखी घाण नको”, अशीदेखील भूमिका नितेश राणे यांनी मांडली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed