उकाडा! राज्यात ४३.६ अंश तापमानाची नोंद, सरासरीत तब्बल ५ हून अधिक सेल्सिअसची वाढ
मुंबई: सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही केंद्रांवर सोमवारी सरासरीपेक्षा पाच अंशांनी अधिक तापमान होते. दरम्यान, महामुंबई आणि लगतच्या ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी गेले दोन दिवस ४० अंश सेल्सिअसहून अधिक कमाल तापमानाची नोंद झाली. सोमवारी तलासरी येथे सर्वाधिक ४३.६ तापमानाची नोंद झाली, तर मुरबाडमध्ये ४३.२ तापमान नोंदवले गेले, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
