Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९ वा वर्धापन दिन पिंपरी-चिंचवड शहरातील रामकृष्ण मोरे सभागृहात साजरा करण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९ वा वर्धापन दिन पिंपरी-चिंचवड शहरातील रामकृष्ण मोरे सभागृहात साजरा करण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. येत्या ३० मार्च रोजी मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. त्यावेळी मी दांडपट्टा चालविणार असल्याने, आत्ता चाकू, सुरा कशाला चालवू, असे म्हणत आज फक्त माझ्या मनसैनिकांना शुभेच्छा देणार आहे. आज पक्षाला १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत काय केले, असा प्रश्न असंख्य पक्षांना पडला आहे. हीच मनसेची ताकद आहे, असे ते म्हणाले. आम्ही आमचे खणखणीत दुकान बांधू. आपण फेरीवाले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
आम्हाला एक खून माफ करा; रोहिणी खडसेंची राष्ट्रपतींकडे अजब मागणी, नेमकं काय म्हणाल्या त्या? पाहा VIDEO
‘ते गंगाजल मी पिणार नाही!’
राज ठाकरे यांनी यावेळी प्रयागराज कुंभमेळ्यातील जलप्रदूषणावर टीका केली. ‘आमच्या बाळा नांदगावकरने मला गंगाजल आणले. मी म्हटलो हट, मी नाही पिणार. त्या गंगेत हजारो लोकांनी आंघोळी केल्या. अजिबात स्वच्छता नाही. ते पाणी कोण पिणार. आपल्या देशातील एकही नदी स्वच्छ नाही. तरी आपण नदीला माता म्हणतो. परदेशात नदीला माता म्हणत नाहीत. तरी नदी एकदम स्वच्छ असते. दोन वर्षांपूर्वी करोना येऊन गेला आहे. तोंडाला फडकी लावून फिरावे लागले. अरे श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर या, डोकी हलवा,’ असे ठाकरे म्हणाले.
देवापर्यंत पोहोचण्यासाठी ३०० वर्षांपासून लढा; ‘या’ गावातील १३० कुटुंबांना का नाकारला जातोय मंदिरात प्रवेश?
‘प्रभू रामचंद्रांना चौदा वर्षांचा वनवास झाला. ते वनवासाला गेले. तिकडे माता सीतेचे अपहरण झाले. प्रभू रामचंद्रांना सुग्रीव, हनुमान भेटले. समुद्रात सेतू बांधला. लंकेत जाऊन युद्ध झाले. रावण मारला गेला. प्रभू रामचंद्र पुन्हा इकडे आले. हे सर्व रामयण चौदा वर्षांत झाले आणि आपण एक सी लिंक चौदा वर्षे बांधत होतो. अशी अनेक कामे आहेत, ज्याच्याबद्दल मी गुढीपाडव्याला सविस्तर बोलणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.
Vijay Wadettiwar: बेईमान भावांना तू माफ करशील का? विजय वडेट्टीवार यांचे लाडक्या बहिणींना खुले पत्र
पदाधिकाऱ्यांना इशारा
‘पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांसाठी एक नवीन नियमावली तयार करीत आहोत. यामध्ये प्रत्येक नेता, पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात येणार आहे. संबंधित पदाधिकारी ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत आहे की नाही, याचे मॅपिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी एक वेगळी व्यवस्था उभी करण्यात आली आहे. जो पदाधिकारी दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणार नाही, त्याला पदावर ठेवण्यात येणार नाही’, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

