Santosh Deshmukh Case Update in Marathi : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दाखल झालेल्या आरोपपत्रातून नवीन माहिती समोर येत आहे. आरोपींनी कशाप्रकारे त्यांना हाल-हाल करून संपवलं? उलट्या काळजाच्या आरोपींनी त्यांना तडपवून-तडपवून संपवलं होतं. अशातच हत्येआधी देशमुख मुलीला काय बोलले होते? याबाबत वैभवी देशमुखचा जबाब समोर आलाय.
माझे काही बर वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे. विष्णू चाटे आणि संतोष देशमुख यांचं बोलणं झालं होतं, त्यावेळी भाऊ एवढं काय झालं नाही? कशाला इतकं ताणता? लहान गोष्टीवरून जीवावर कशाला उठता, असं वडील चाटेशी बोलत होते. जवळपास दहा-बारा मिनिटे फोन सुरू होता असं वडिलांनी मला सागितल्याचं वैभवी देशमुखने आपल्या जबाबात म्हटलं आहे.
जेव्हा संतोष देशमुख आणि ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांना मारहाण करून हकललं. त्यानंतर विष्णू चाटे याने देशमुखांना फोन केला होता. या फोननंतर देशमुख तणावामध्ये असल्याचं त्यांच्या पत्नीनेही म्हटलं होतं. ६ डिसेंबरला ही घटना झाल्यावर आरोपी त्यांच्यावर पाळत ठेवून होते. ९ डिसेंबरला देशमुखांचं अपहरण करत त्यांनी संपवलं. आरोपींना त्यांना हालहाल करून संपवल्याचे फोटो आता समोर आले. तेव्हा महाराष्ट्रात संतपाची लाट उसळली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. विरोधी आमदारांनी त्याचा मर्डर झाल्याच संशय व्यक्त केला आहे. कृष्णा आंधळे यानेच देशमुखांना मारताना फोटो आणि व्हिडीओ काढल्याची समोर आलं होतं. देशमुख त्यांना माझे हातपाय तोडा पण मुलीसाठी जगू द्या अशी विनंती करत होते. मात्र उलट्या काळजाच्या आरोपींनी त्यांना संपवलं आणि मृतदेह फेकून देत फरार झाले होते.

