• Sun. Jun 7th, 2026
    घोटाळे ते खून, सगळं बीडमध्ये कसं? ‘कुटे’ काय घडलं? सुरेश धसांकडून सचिन पिळगावकरांचाही उल्लेख

    Suresh Dhas: गेल्या तीन महिन्यांपासून बीड जिल्हा राज्यात चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बीड: गेल्या तीन महिन्यांपासून बीड जिल्हा राज्यात चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या खून प्रकरणानंतर बीडमध्ये अनेक घटना चर्चेत आहेत. घोटाळे, पेपरफुटी, पीकविम्यातील भ्रष्टाचार, बँकांमधील अपहार या सगळ्याची चर्चा आता सुरु झाली. बीडमध्ये नेमकं चाललंय काय, असा प्रश्न यामुळे राज्यातील जनतेला पडला आहे.

    कॉपी प्रकरण, पेपरफुटी, पीक विमा, हार्वेस्टर, ज्ञानराधा कॉऑपरेटिव्ह यासारख्या विविध प्रकरमांमुळे बीड राज्यात चर्चेत आहेत. याबद्दल भाजप आमदार सुरेश धस यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर भाष्य केलं. ‘बीड खूप अवघड जिल्हा आहे. बीड दिशा दाखवतो. चांगल्याही दिशा दाखवतो आणि वाईटही दिशा दाखवतो. ज्ञानराधा म्हणजे सुरेश कुटे आणि कंपनी. सोयाबीनपासून तेल काढायचा उद्योग होता. तिरुमला असं तेलाच्या ब्रँडचं नाव होतं. त्याच्या जाहिरातीत सचिन पिळगावकर आणि त्यांची बायको सुप्रिया पिळगावकर होत्या,’ असं म्हणत धसांनी तिरुमला तेलाच्या जाहिरातीचा उल्लेख केला. त्यात सचिन पिळगावकर ‘माझ्या बायकोच्या हातचे आवडते पदार्थ मी नेहमी खातो’ म्हणताना दिसले होते. सोबत सुप्रिया पिळगावकरदेखील होत्या.
    Fighter Plane Crash in Haryana: हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं, तुकडे दूरवर पसरले; पायलटच्या ‘त्या’ निर्णयानं अनर्थ टळला
    ‘कुटेचं चांगलं चाललं होतं. त्याची भरभराट सुरु होती. तेव्हा त्यानं ज्ञानराधा मल्टिस्टेट काढली. त्या मल्टिस्टेटमध्ये जवळ जवळ ३७०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. नंतर या पठ्ठ्यानं जमिनी घेतल्या. तेलाचे प्लांट सुरु केले. फलटणचं गुड मॉर्निंग दूध त्यांनी विकत घेतलं. त्यात तो फसला. तो प्लांट २०० कोटींचा होता. या पठ्ठ्यानं ६५० कोटींना विकत घेतला. त्यानंतर गुड मॉर्निंग दूध करत बसला. या गुड मॉर्निंगनं त्याची बॅड मॉर्निंग केली,’ असं धस मिश्किलपणे म्हणाले.
    Anil Parab vs Pravin Darekar: ‘त्या’ आमदारानं कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय! अरे तुमची लायकी आहे का? परब-दरेकरांमध्ये खडाजंगी
    ‘ज्ञानराधानं लोकांना २३.८ टक्के परताव्याचं आमीष दाखवलं. लोकांनी इतर बँकांमधून भसाभस पैसे काढले आणि मल्टिस्टेटमध्ये गुंतवले. याच कालावधीत आमच्याकडे रेल्वे आली होती. त्यासाठी सरकारनं लोकांच्या जमिनी घेतल्या होत्या. त्याचे पैसे लोकांना मिळाले होते. लोकांनी ते ज्ञानराधात टाकले. असाच उद्योग जिजाऊ माँसाहेबचा. या बँकांची नावं पण बघा कशी? बीडच्या लोकांची चूक तरी काय? जिजाऊ माँसाहेब, साईराम, राजस्थानी मल्टिस्टेट. राजस्थानी मल्टिस्टेट परळीची. त्यात ३०० कोटी रुपये बुडाले आहेत. त्यातील २५० कोटी एकट्या परळीतील आहेत. या बँकेनं ३०० कोटींचं कर्ज परळीतच दिलंय. आका आणि आकाच्या शिफारसीवरुन हे कर्ज वाटप झालंय. त्यात वाट्टोळं सर्वसामान्यांचं झालं,’ असा दावा धसांनी केला.

    ‘ज्ञानराधामध्ये १६ लाख ठेवीदार आहेत. त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. यावर बबनराव लोणीकर, प्रकाश सोळंके आणि मी बोललो आहोत. मी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. या बँकांची नावं कशी आहेत बघा. ज्ञानराधा, जिजाऊ माँसाहेब, साईराम. तुम्ही साईंना बदनाम केलं आणि जिजाऊ माँसाहेबांनादेखील बदनाम केलं,’ असं धस म्हणाले.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed