• Sun. Jun 14th, 2026
    मुंबईची भाषा मराठीच! माफी मागा अन्यथा.., भय्याजी जोशींच्या विधानावर आदित्य ठाकरे आक्रमक

    Aditya Thackreay on Bhaiyyaji Joshi – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेसंबंधी केलेल्या विधानाचा आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतानाच सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी घाटकोपरमध्ये बोलताना यांनी मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलच पाहीजे असे नाही. घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे वक्तव्य धक्कादायक वक्तव्य करुन वाद निर्माण केला आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार टिका केली असून त्यांनी माफी मागावी ही अन्यथा कारवाईची मागणी करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

    आदित्य ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की, घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे या भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरुन कळंल असेल की बुलेट ट्रेन ते का करत आहेत आणि नेमंक कोणासाठी त्यांना करायची आहे. आपल्याकडे देशातील लाखो लोक येतात. स्वप्न घेऊन येतात. ते मोठेही होतात. पण या मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे हे सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी जाणून घ्यावं आणि या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागावी अन्यथा अबु आझमी, कोरटकर, सोलापूरकर यांच्यासोबतच जोशी यांच्यावरही कारवाईची मागणी करत आहोत. भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर काय हे पाहायचं आहे.

    ते पुढे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला असे फडणवीस सांगत होते. सेलिब्रिटींना ट्विट करायलाही लावले. आपल्या राज्यात मराठी भाषा भवन आम्ही महाविकास आघाडी सरकार म्हणून करत होतो. त्याला या सरकारने स्थिगिती दिली आहे.तर मराठी नाट्य कलेचे दालन रद्द केले आहे. कोश्यारी असतील, कोरटकर, सोलापूरकर यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या आपल्या महापुरुषांचा अपमान करण्यात आला आहे आणि हे सर्व किती पाहायचं किती सोसायचे हा विचार करायची वेळ आली आहे.

    भय्याजी जोशींचा भाव समजून घ्या
    आमदार राम कदम यांनी या वादग्रस्त विधानावर भाष्य करताना म्हटले आहे की, भय्याजी जोशी हे त्यागपूर्ण समर्पित जीवन जगणारी थोर व्यक्ती आहेत. ते जे बोलले त्याच्यातील भाव समजून घेतला पाहिजे .

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed