Aditya Thackreay on Bhaiyyaji Joshi – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेसंबंधी केलेल्या विधानाचा आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतानाच सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले आहेत.
आदित्य ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की, घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे या भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरुन कळंल असेल की बुलेट ट्रेन ते का करत आहेत आणि नेमंक कोणासाठी त्यांना करायची आहे. आपल्याकडे देशातील लाखो लोक येतात. स्वप्न घेऊन येतात. ते मोठेही होतात. पण या मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे हे सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी जाणून घ्यावं आणि या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागावी अन्यथा अबु आझमी, कोरटकर, सोलापूरकर यांच्यासोबतच जोशी यांच्यावरही कारवाईची मागणी करत आहोत. भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर काय हे पाहायचं आहे.
ते पुढे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला असे फडणवीस सांगत होते. सेलिब्रिटींना ट्विट करायलाही लावले. आपल्या राज्यात मराठी भाषा भवन आम्ही महाविकास आघाडी सरकार म्हणून करत होतो. त्याला या सरकारने स्थिगिती दिली आहे.तर मराठी नाट्य कलेचे दालन रद्द केले आहे. कोश्यारी असतील, कोरटकर, सोलापूरकर यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या आपल्या महापुरुषांचा अपमान करण्यात आला आहे आणि हे सर्व किती पाहायचं किती सोसायचे हा विचार करायची वेळ आली आहे.
भय्याजी जोशींचा भाव समजून घ्या
आमदार राम कदम यांनी या वादग्रस्त विधानावर भाष्य करताना म्हटले आहे की, भय्याजी जोशी हे त्यागपूर्ण समर्पित जीवन जगणारी थोर व्यक्ती आहेत. ते जे बोलले त्याच्यातील भाव समजून घेतला पाहिजे .

