Authored byमानसी देवकर | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम5 Mar 2025, 2:48 pm
मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेचा विनंयभंग केल्याचा आरोप आहे. अशा मंत्र्यांना लाथ मारली पाहिजे अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील महिलेचा छळ केल्याचा आरोप आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून गोरेंवर टीकेची झोड उठवण्यात येतेय. या आरोपांनंतर जयकुमार गोरे यांनी हे प्रकरण जुनं असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं.