Tribal Students Yavatmal : यवतमाळातील आदिवासी विद्यार्थिनींना रात्रभर वसतिगृहातच डांबून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली. विद्यार्थिनींचे आंदोलन दडपण्यासाठी वसतिगृहाबाहेर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत यवतमाळ शहरात तीन मुलांचे व दोन मुलींचे वसतिगृह आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहातच नाष्टा आणि जेवणाची व्यवस्था राहत होती. नंतर जेवणाच्या दर्जावरून विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढल्याने सरकारने २०१६पासून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे सुरू केले. विद्यार्थी त्यांच्या पसंतीच्या खाणावळीतून जेवण घेऊ शकतो. यानंतर विद्यार्थ्यांच्या तक्रारी कमी झाल्या. पण, आठ वर्षांपासून ३,७०० रुपये इतकाच निर्वाह भत्ता महिन्याला दिला जात आहे. महागाईच्या तुलनेत भत्ता वाढविण्यात न आल्याने विद्यार्थ्यांनी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांना भेटून निवेदन दिले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी (पांढरकवडा) यांच्याकडेही व्यथा मांडली. कुणीही त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही.
अहमदाबाद ते मुंबई फक्त ३ तासांत; बुलेट ट्रेनचे काम प्रगतिपथावर, किती काम पूर्ण? कोणत्या स्टेशनला थांबा?
यावरून संतप्त विद्यार्थ्यांनी सोमवारी यवतमाळातील बिरसा मुंडा चौकात आंदोलन केले. यानंतर पांढरकवडाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर; ९५ किलोमीटर लाँग मार्च काढण्याचे जाहीर केले. मात्र मुलींच्या वसतिगृहातील वॉर्डनने बाहेरून कुलूप लावून विद्यार्थिनींना कोंडले. वसतिगृहाबाहेर पोलिसांनी बॅरिकेड लावले.
‘वाढवण’चा डोलारा रेतीवर; २० कोटी घनमीटर उत्खननासाठी JNPAला १०,२७७ हेक्टर जागेचा परवाना
एकही विद्यार्थिनी बाहेर पडणार नाही यावर लक्ष ठेवले गेले. परिस्थिती चिघळत असल्याचे दिसताच वॉर्डन व्ही. बी. तेलंगे यांनी प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांना माहिती दिली. त्यांनी आपण यवतमाळला चर्चेसाठी येत असल्याचे सांगितले. यानुसार मंगळवारी त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

