Amruta Devendra Fadnavis: बँकर ते मिसेस मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या अमृता फडणवीस त्यांच्या विधानांमुळे, गाण्यांमुळे कायम चर्चेत असतात. काही वक्तव्यांमुळे त्या वादातही सापडल्या आहेत.
बँकिंग क्षेत्रात उच्चपदावर काम करणाऱ्या अमृता यांना लग्न करताना वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा वाटला. ‘मिड-डे’ वृत्तपत्रासोबत त्यांनी त्यांच्या काही आठवणी शेअर केल्या. देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच अमृतादेखील मूळच्या नागपूरच्या आहेत. लग्नाआधी मी राजकीयदृष्ट्या तितकीशी सजग नव्हते, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. ‘मला हे सांगताना खेद वाटतो, वाईट वाटतं, पण देवेनजींशी लग्न होईपर्यंत म्हणजेच वयाच्या २६ व्या वर्षापर्यंत मी मतदानच केलं नव्हतं,’ अशी कबुली अमृता फडणवीस यांनी दिली.
बीडमधील १७२ पैकी १०७ पोलीस अधिकाऱ्यांचे विनंती अर्ज; देशमुख हत्या प्रकरणानंतर चाललंय काय?
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लग्न कसं ठरलं, त्याबद्दलही अमृता फडणवीस सविस्तर बोलल्या. ‘दोन्ही कुटुंब परिवाराशी संबंधित एका मित्रानं आमचे फोटो एक्स्चेंज केले होते. माझा तो फोटो अतिशय कॅज्युल अवतारात होता. त्यामुळे देवेंद्रजींच्या आई फोटो पाहून काहीशा धास्तावल्या. तो फोटो मुलाकडच्या कुटुंबाला पाठवण्यासारखा नव्हता, असं त्यांचं मत होतं,’ अशी आठवण अमृता यांनी सांगितली.
Walmik Karad: अशानं भिकेला लागू! संतोषला धडा शिकवा! कराडचे आदेश; ‘मोकारपंती’वरील VIDEO सीआयडीच्या हाती
‘आईचा असा समज असताना देवेंद्रजींना मात्र मी त्यांच्यासाठी योग्य वाटले होते. पण माझ्यासाठी वैयक्तिक स्वातंत्र्य महत्त्वाचं होतं. माहेरी जे स्वातंत्र्य मिळालं, ते लग्नानंतर मिळेल का, हा माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा होता. कारण लग्नानंतर सगळं स्वातंत्र्यच गेलं, अशा काही मैत्रिणी मी पाहिल्या होत्या. पण देवेंद्रजी वैयक्तिक स्वातंत्र्य देणारे होते. माझी प्रगती व्हावी, या मताचे होते. तोच मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा होता,’ असं अमृता म्हणाल्या. अमृता आणि देवेंद्र यांचा विवाह २००५ मध्ये झाला. त्यांना दिविजा नावाची कन्या आहे. ती सध्या इयत्ता दहावीत शिकते.

