Sanjay Shirsat on Devendra Fadnavis Decision : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका निर्णयाला स्थगिती दिली आहे. आरोग्य विभागातील ३ हजार २०० कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली. साफ सफाईच्या कामाचे कंत्राट एका अनुभन नसलेल्यास कंपनीला दिले असल्याने ही स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे. यावर शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतांना संख्याबळ कळतं का काही? विरोधी पक्षानेते बनण्यासाठी किती संख्याबळ लागतं. कोणत्याच पक्षाकडे संख्याबळ नाही, हा अधिकार अध्यक्षांचा आहे. ते काय निर्णय घेतील हा भाग वेगळा आहे. पण कायदेशीर दृष्ट्या पाहिलं तर विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता हा कोणत्याच पक्षाचा होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. ज्या मविआसोबत आहेत ते सगळे ते यांना पाठिंबा देण्यासाठ तयार नाहीत एकही बोलकत नाही की आमचा पाठिंबा हे. त्यामुळे विरोधी पक्षाचा पेच या अधिवेशनातही कायम राहिलं, असं शिरसाटांनी सांगितलं.
रामदास कदम यांचा मुलगा गृहराज्यमंत्री आहे. तेही सत्तेमध्य सहभागी आहेत. तुमच्याकडे येण्याचा प्रश्नच नाही, हे फक्त त्यांच्या पक्षातली जे बाहेर चाललेत त्यांना अडवून नवीन वातावरण करण्यासाठी आहे, पण उबाठाला लागलेली गळती आता थांबणार नाही, कोकाटेला वाचण्याचा प्रयत्न नाही. कोर्टाने त्यांना शिक्षा दिली, त्यानी अपील केल्यावर त्यांना दिलासा मिळाल्याचं शिरसाटांनी सांगितलं.
संजय राऊतांनी भान ठेवावं- संजय शिरसाट
संजय राऊत हे तीन महिने जेलमध्ये होते. त्यांना आम्ही वाचवतोय का? याच अर्थ आम्ही वाचवलं का? कोर्टाचा निर्णय सर्वांना मान्य असतो. राज्य घटनेच्या विरोधात कसं जाता येईल? बाबासाहेब आंबेडकरांची घटना पायदळी तुडवल्यासारखं होणार नाही का? असं बेताल वक्तव्य करण्यापेक्षा स्वत: बेलवर आहोत याचं भान त्यांनी ठेवावं, असं म्हणत शिरसाटांनी राऊतांवर निशाणा साधला.

