• Wed. Sep 9th, 2026
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट यांचा दणका, वीस कोटींची कामे रद्द

Sanjay shirsat News :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २० कोटींची वार्षिक योजनेतील कामे चुकीच्या पद्धतीने मंजूर झाल्यामुळे रद्द करण्यात आली आहेत, अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. या निधीतून पाच कोटी खर्च करून पोलिसांना ३५ स्कॉर्पिओ गाड्या वितरित केल्या जाणार आहेत, असेही त्यांनी यावेळ स्पष्ट केले.

महाराष्ट्र टाइम्स

छत्रपती संभाजीनगर : वार्षिक योजनेच्या कामांपैकी तब्बल २० कोटींची कामे आता रद्द करण्यात आली आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतील ही कामे चुकीच्या पद्धतीने मंजूर करण्यात आली होती. त्यामुळे ही मंजूर करण्यात आलेली कामे रद्द करण्यात आली आहेत, असे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. बुधवारी (२६ फेब्रुवारी) पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दणका

विधानसभा निवडणुकीनंतर शिरसाट यांना मंत्रिपद आणि नंतर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील काही कामांना कात्री लागणार, असे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी मागील दोन महिन्यांत जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचा आढावा घेतला. हा आढावा घेतल्यानंतर यातील काही कामे रद्द करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता जिल्हा वार्षिक योजना आराखड्याच्या निधीतील २० कोटींची कामे रद्द करण्यात आल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
Amol Mitkari : शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची नावे घेत अमोल मिटकरींचे खळबळजनक आरोप, महायुतीत पुढे काय घडणार?काही कामे चुकीच्या पद्धतीने मंजूर- संजय शिरसाट

शिरसाट म्हणाले, ‘जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांचा आढावा घेतला. त्यात काही कामे चुकीच्या पद्धतीने मंजूर केली होती. यामध्ये काही कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या. परंतु कार्यारंभ आदेश नव्हते. काही कामांचा दोनदा समावेश करण्यात आला होता. अशी सुमारे २० कोटींची कामे रद्द करण्यात आली आहेत.’ ‘या २० कोटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यात पाच कोटी खर्च करून पोलिसांना स्कॉर्पिओ देणार आहेत.

२० कोटींची कामे रद्द

यामध्ये पोलिस आयुक्तालयाला २०, ग्रामीण पोलिसांना १० आणि एसआरपीएफला पाच अशा ३५ गाड्या वितरित करण्यात येतील,’ असे त्यांनी सांगितले. संजय शिरसाट यांच्या या निर्णयानंतर मोठा दणका बसल्याचे बघायला मिळतंय. शिरसाट नीलम गोऱ्हे प्रकरणात संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. एका बाईवर सर्वजण तुटून पडल्याचे त्यांनी सांगितले. नीलम गोऱ्हे प्रकरणात उबाठा गट हा आक्रमक होताना दिसतोय. त्यांच्या घरासमोर येेत काही महिलांनी आंदोलन देखील केले होते.

शितल मुंढे

लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed