• Mon. Mar 16th, 2026
    आंदोलन स्थळावरून मनोज जरांगे पाटील यांचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना फोन, काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Feb 2025, 9:18 pm

    बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले…तरी आरोपींना शिक्षा झालेली नाही. फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्याची आणि दोषींना…कठोर शिक्षा देण्याची मागणी करत ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. मसाजोग ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा यासाठी मनोज जरांगे यांनी…बीडचे जिल्हाधिकारी तसेच बीड पोलीस अधीक्षक यांना आंदोलनाच्या ठिकाणाहून फोन लावला.या आंदोलनाबाबत तसेच मागण्याबाबत या दोन्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्या तातडीने मार्गी लावाव्यात…असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना म्हटले आहे. तसेच प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती देखील जरांगेंनी केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed