• Tue. Jun 9th, 2026

    My Marathi kalasangam 2025: अक्षरे विचारांसकट वाचता यायला हवीत, तेच खरे सुलेखन! ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांचे बोल

    My Marathi kalasangam 2025: अक्षरे विचारांसकट वाचता यायला हवीत, तेच खरे सुलेखन! ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांचे बोल

    My Marathi kalasangam 2025: अर्थार्जनासाठी फळ्यावरील अक्षरे बॅनरवर आणि साइन बोर्डवर गिरवू लागलो. सुलेखनाच्या सरावातून स्वतःची शैली सापडत गेली. अक्षरे विचारांसकट वाचता यायला हवीत. तेच खरे सुलेखन,’ असे अनुभवाचे बोल ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांनी व्यक्त केले.

    महाराष्ट्र टाइम्स
    achuyt palv

    मुंबई : ‘शालेय जीवनात शेवटच्या बाकावर असणारा मी शिक्षकांच्या सूचनेनुसार फळ्यावर सुविचार लिहू लागलो. माझे अक्षर फारसे चांगले नव्हते, परंतु साइन बोर्ड लिहिणाऱ्या व्यक्तींचे निरीक्षण करून अक्षरांचे वळण लक्षात येऊ लागले. दहावी नापास झालो, तेव्हा वडील म्हणाले अपयश ही यशाची पहिली पायरी असते हा तूच फळ्यावर लिहिलेला सुविचार आठव. मग जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. अर्थार्जनासाठी फळ्यावरील अक्षरे बॅनरवर आणि साइन बोर्डवर गिरवू लागलो. सुलेखनाच्या सरावातून स्वतःची शैली सापडत गेली. अक्षरे विचारांसकट वाचता यायला हवीत. तेच खरे सुलेखन,’ असे अनुभवाचे बोल ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांनी व्यक्त केले.

    महाराष्ट्र टाइम्स मायमराठी कलासंगम महोत्सवात पालव यांची प्रकट मुलाखत झाली व या दरम्यान त्यांनी सुलेखनाची प्रात्यक्षिकेही सादर केली. पालव यांनी मुलाखतीदरम्यान विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत कॅनव्हासवर विविध अक्षरे रेखाटून त्यातील कलात्मकता स्पष्ट केली. एखादा गायक जसा सुरांच्या साथीने गाण्याची मैफल रंगवतो, तशी रंग आणि रेषांची मैफल पालव यांनी रंगवली.
    हिंदूंच्या थट्टेला माफी नाही; महाकुंभवरील टिप्पणीवरुन पंतप्रधान मोदींचे विरोधकांवर टीकास्त्र
    ‘संस्कार हे करावे लागत नाहीत ते आपोआप होतात. मुंबईतील परळचे शिरोडकर हायस्कूल, तेथील शिक्षक, लालबाग परिसरातील साFन बोर्ड कलाकार यांच्याकडून कळत नकळत शिकत गेलो ,’ असेही त्यांनी सांगितले. विविध ठिकाणी चौकात लागणारे फलक पाहून वळणदार अक्षरांचे महत्त्व मला समजले. त्याची आवड निर्माण होऊन सराव करू लागलो. त्यातून सुलेखनाचे संस्कार झाले, असेही त्यांनी नमूद केले.

    ‘अक्षरलेखनाच्या या साधनेत केलेल्या मोडी लिपीच्या अभ्यासाविषयीही त्यांनी माहिती दिली. जे. जे.मध्ये छायाचित्रण, रेखाचित्र आणि अक्षरलेखन या विषयांपैकी अक्षर निवडले. अक्षरांच्या या सरावाने मला मानमरातब आणि प्रतिष्ठा मिळवून दिली,’ असे त्यांनी सांगितले.
    दुर्दैवी! परीक्षेपूर्वीच कापली गेली आयुष्याची दोरी, नाशिकमधील दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू
    विंदा करंदीकर, गुलजार यांच्या कवितांचे अक्षरलेखन आणि या दोन्ही शब्दप्रभूंकडून मिळालेली दाद यांविषयीच्या आठवणीही त्यांनी जागवल्या. त्यांनी अक्षर लेखनाची प्रात्यक्षिके सादर केली. त्याला रसिकांनी चांगली दाद दिली. पद्मश्री पुरस्कार हा दृश्यकलेचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले. कलावंताला सातत्याने कलेची साधना करावी लागते. तरच स्वतःचा सूर गवसतो, असा सल्ला त्यांनी नव्या पिढीतील कलाकारांना दिला. खूप मेहनत घेतली की यश मिळतेच, असेही त्यांनी स्वानुभवातून सांगितले. यामिनी सप्रे आणि अनुजा चवाथे यांनी पालव यांच्याशी संवाद साधला.
    Sharad Pawar: संमेलनात अशा वक्तव्यांची गरज नव्हती; ​शरद पवार यांचे नीलम गोऱ्हेंवर टीकास्त्र
    सुलेखनाला कलाकृतीचा दर्जा
    जे. जे. कला महाविद्यालयात र. कृ. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुलेखनाचे (कॅलिग्राफी) रीतसर प्रशिक्षण घेऊन पुढे आपली स्वतंत्र शैली विकसित करणाऱ्या अच्युत पालव यांनी अक्षर सुलेखनाला कलाकृतीचा दर्जा दिला. २००५च्या अतिवृष्टीत त्यांचा स्टुडिओ बुडाला. त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले. तेव्हा त्यांनी बाजारातून रंगीत छत्र्या आणून त्यावर अक्षरे रंगवली. ‘बरसात में ताक धिना धीन’ या शीर्षकाची ती छत्रीचित्रे खूप लोकप्रिय झाली. आजवरच्या कारकिर्दीतील अशा अनेक आठवणी आणि किस्से पालव यांनी उपस्थितांना सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed