Uddhav Thackeray on Neelam Gorhe : ‘मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी अशी मागणी होत असलेले माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंचं रक्षण करणे हे यांचे हिंदुत्व आहे का? न्यू इंडिया बँक बुडाली. ज्यांच्यामुळे बुडाली त्यांचे रक्षण करणे भाजपचे हिंदुत्व आहे का’ असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला.
काँग्रेस नेते किरण काळे यांनी रविवारी शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीका केली. ‘आज गाडगेबाबांचे स्मरण केले पाहिजे. धर्म जगायचा असतो. सांगायचा नसतो, असे गाडगेबाबा नेहमी सांगायचे. शिवाजी महाराजांनीही दुसऱ्यांचा द्वेष करायला नाही सांगितले. ज्यांनी धर्माचा खेळखंडोबा केला आहे, त्यांचे मुस्लिम प्रेम कसे आहे, हे मी सांगू शकतो. थोरले की धाकले बंधूंबद्दल मोदींनी आपुलकीने ट्वीट केले आहे. भाजप निवडणुकीपुरती धर्मांधता माजवत आहे. हे देशासाठी योग्य नाही’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray : मुंडे-कोकाटेंना वाचवणं हेच भाजपचं हिंदुत्व का? ठाकरेंचा हल्लाबोल; “नीलमताई स्वतः मर्सिडीजमधून फिरतात, मग…”
Raj Thackeray : मनसे फोडायचा विचारही करु नका, ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंनी उदय सामंत यांना सुनावलं, सव्वा तासांच्या हायव्होल्टेज बैठकीतील अंदर की बात
‘मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी अशी मागणी होत असलेले माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंचं रक्षण करणे हे यांचे हिंदुत्व आहे का? न्यू इंडिया बँक बुडाली. ज्यांच्यामुळे बुडाली त्यांचे रक्षण करणे भाजपचे हिंदुत्व आहे का’ असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला. आता राज्य आणि देशात अंदाधुंद कारभार माजला आहे. तो दूर करून हिंदुत्वाचे रक्षण केले पाहिजे. जनतेला फसवले गेले. निवडणुकीत अनेक रेवड्या देऊन फसवले. आता त्या उघड्या पडत आहेत. त्यामुळे लोकांना दिलासा देणे आपले काम आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Ravindra Dhangekar : गळ्यात भगवा घालून फोटो, ऋषी कपूरचं ‘ते’ गाणं; काँग्रेसने संधी नाकारताच रवींद्र धंगेकर यांचं सूचक स्टेटस
कोकाटे यांच्या निकालाची प्रत आली नसल्याचे विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. त्यावरही ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘न्यायालयाने तत्परता दाखवावी. आमच्याबाबतचा निकाल लागला नाही. याबाबत निकाल लागला. त्यामुळे किमान प्रत तरी नार्वेकरांच्या हाती द्यावी. न्यायालयाच्या प्रतीचा मान, आदर, सन्मान राखणारे असतील तर आमच्याबाबत दिलेला न्याय दिला तो न्याय कसा होऊ शकतो’, असा प्रश्न त्यांनी केला. यावेळी त्यांनी निलम गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपांनाही उत्तर दिले. ‘मी अशा गयागुजऱ्या लोकांकडे लक्ष देत नाही. महिला म्हणून त्यांचा आदर आहे. त्या स्वत: मर्सिडीजमधून फिरतात, मग लाडक्या बहिणी का उपाशी राहिल्या’, असा प्रश्न ठाकरे यांनी केला.

