• Mon. Jun 15th, 2026
    कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा विषय मुख्यमंत्र्यांचा…, कृषीमंत्र्यांनी जबाबदारी झटकली; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

    Manikrao Kokate Remarks on Farmer : मी शेतकऱ्यांबद्दल कोणतंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. गैरसमजापोटी काही झालं असेल, मात्र असं मी काहीही बोललेलो नाही. काही लोकांना राजकारण करून याचा फायदा घ्यायचा असेल तो त्यांचा प्रश्न आहे, असे प्रत्युत्तर माणिकराव कोकाटेंनी दिले आहे.

    Lipi

    नयन यादवाड, कोल्हापूर : मी शेतकऱ्यांबद्दल कोणतंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. गैरसमजापोटी काही झालं असेल, मात्र असं मी काहीही बोललेलो नाही. शेतकरी हा या देशाचा राजा आहे. शेतकऱ्यांबद्दल अपशब्द मी बोललो नाही, कधी बोलणार नाही. काही लोकांना राजकारण करून याचा फायदा घ्यायचा असेल तो त्यांचा प्रश्न आहे, अशा शब्दांत माणिकराव कोकाटे यांनी राजू शेट्टींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत होते.

    गेल्या काही दिवसांपूर्वी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य करत भिकारी संबोधल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केल होता. याचाच निषेध म्हणून कोल्हापुरात स्वाभिमानीचा आंदोलन देखील झाले. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा प्रत्येक जिल्ह्यात काळे झेंडे दाखवून आंदोलन करू, असा इशारा दिला होता. यालाच माणिकराव कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

    ‘ज्या पद्धतीने पैसे उपलब्ध होतील तसे देण्यात येतील’

    कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असता सकाळपासून कृषीविभाग संदर्भातील विविध बैठका आणि कार्यक्रम शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाले. यावेळी शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांसमोर अनेक अडचणी मांडल्या यानंतर माध्यमांशी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाबद्दल अडचणी सांगितल्या आहेत, ते आम्ही नोंदवून घेतले असून शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बसून निर्णय घेऊ, असे सांगितले आहे. तसेच कोणत्याही शेतकऱ्याला सोलार सक्ती केलेली नाही. मात्र जिथं महावितरणचं कनेक्शन गेलेलं नाही तेथे सोलार सिस्टीम देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे देखील कोकाटेंनी सांगितले. तसेच ज्या शेतकऱ्यांचं पिकाच नुकसान झालेलं आहे त्यांना पीक विम्यातून रक्कम देण्याचे काम सुरू आहे. जे शेतकरी राहिले असेल त्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
    दहावीचा पहिलाच पेपर कसा फुटला? शिक्षण मंत्री दादा भुसे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं?

    ‘न्यायालयाच्या निकालाविरोधात मी उच्च न्यायालयात जाणार’

    कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. काल त्यांना 30 वर्षांपूर्वीच्या एका फसवणुकीच्या प्रकरणात कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली असल्याने विरोधकांकडून त्यांच्या मंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा मागितला जात आहे. याला देखील कोकाटे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांनी कसं वागाव हे त्यांनी ठरवावं हा मुद्दा माझा नाही. त्यांनी केलेल्या मागणीचा फारसा विचार करण्याची गरज वाटत नाही, असे कोकाटे म्हणाले आहेत. तसेच घर घेताना १९८९ साली मी अर्ज केलेला आहे. खरेदी ९३ आणि ९४ आहे मध्ये पाच वर्षाचा अंतर आहे आणि यामध्ये दोन हजार रुपयेच माझे उत्पन्न वाढलेलं आहे. काही गोष्टी रेकॉर्डवर आले नाहीत यामुळे गैरसमजतातून काही विषय झाले आहेत. पण न्यायालयाकडे अधिकार आहे न्यायालयाने निकाल दिला आहे. याविरोधात मी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे कोकाटे म्हणाले.

    ‘मोफत वीज देण्याचा विषय मुख्यमंत्र्यांचा ते उत्तर देतील’

    तसेच तिला काही वर्षात बोगस बियाणं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच प्रमाणात वाढ झाली आहे. या संदर्भात देखील कृषी खातं दखल घेत या संदर्भात आम्ही बियाणे वाटप करणाऱ्यच कृषी खात्याकडे रजिस्ट्रेशन करणार आहोत आणि कृषी खाते त्यांच्यावर नियंत्रण ठेवणार असून बोगस बियाणे मिळाले तर नुकसान भरपाई आम्ही जबाबदार असू असे ते म्हणाले आहेत. तर निवडणूक काळात वीज पंपाना मोफत वीज देण्याची योजना महायुती सरकारने जाहीर केली होती. मात्र आता शेतकऱ्यांना वीज बिल देण्यात येत आहेत या संदर्भात कृषीमंत्र्यांना विचारले असता, मागच्या वेळेस सरकारने सांगितलेलं आहे की आत्ता आणि पुढील पाच वर्ष कृषी पंपाचे वीज बिल भरायचे नाही. मात्र आता मोफत वीज मिळणार का हे मुख्यमंत्र्यांच्या विभागांतर्गत हा विषय येतो तुम्ही त्यांनाच विचारा असे म्हणत त्यावर बोलणं टाळलं आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed