• Mon. Mar 16th, 2026

    पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी विरोधात मूर्तिकार पेणमध्ये एकवटले; बाप्पाच्या गावातून एल्गार

    पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी विरोधात मूर्तिकार पेणमध्ये एकवटले; बाप्पाच्या गावातून एल्गार

    | Updated: 21 Feb 2025, 9:25 pm

    पीओपीच्या गणेश मूर्तींवर न्यायालयाने घातलेल्या बंदी विरोधात राज्यभरातील गणेश मूर्तीकार आक्रमक झाले आहेत. आज गणेश मूर्तींचे माहेरघर असलेल्या पेणमधून एल्गार पुकारण्यात आला. मुंबईसह राज्यातील गणेश मूर्तिकारांच्या संघटनांची बैठक आज पेण इथं पार पडली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    रायगड: पीओपीच्या गणेश मूर्तींवर न्यायालयाने घातलेल्या बंदी विरोधात राज्यभरातील गणेश मूर्तीकार आक्रमक झाले आहेत. आज गणेश मूर्तींचे माहेरघर असलेल्या पेणमधून एल्गार पुकारण्यात आला. मुंबईसह राज्यातील गणेश मूर्तिकारांच्या संघटनांची बैठक आज पेण इथं पार पडली. न्यायालयाच्या निर्णया विरोधात लढा देण्याचा निर्धार आजच्या सभेत करण्यात आला. इतर राज्यात पीओपी मूर्तींवर बंदी नाही मग महाराष्ट्रातच का, असा सवाल मूर्तीकारांनी उपस्थित केलाय. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गाईड लाइन्स आमच्यावर लादल्या गेल्या आहेत.

    केंद्र सरकारने गणेश मूर्तींसाठी लागणाऱ्या पीओपीवर घातलेल्या बंदी विरोधात आज राज्यातील गणेश मूर्तिकार गणपतीचे माहेरघर असलेल्या पेणमध्ये एकत्र आले होते. हमरापूर विभाग गणेश मूर्तिकार उत्कर्ष मंडळाने राज्यातील सर्व गणेश मूर्तिकार, मूर्तिकार संघटना आणि गणेश मंडळांच्या पदाधिकारी आणि मूर्तिकारांच्या या जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, माजी आमदार अनिकेत तटकरे, मुंबईचे मूर्तिकार सुरेश शर्मा, धुळे येथील राजेंद्र चित्ते, खा.धैर्यशील पाटील, आ. रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

    पीओपीवरील बंदी कायमस्वरूपी उठवण्याचा निर्णय न्यायालयाला द्यावा लागेल असा लढा द्यावा लागेल असे अनिकेत तटकरे यांनी सांगून याकरिता बंदी उठवण्याचा लढा मंत्री आदिती तटकरे, पंकजा मुंडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासमवेत एक समिती स्थापन करून योग्य अहवाल न्यायालयात सादर करण्यास शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मूर्तिकार आणि मूर्तिकारांचा व्यवसाय जगला पाहिजे या उद्देशाने आम्ही सर्वजण मूर्तिकार संघटनेसोबत असल्याचे खा. धैर्यशील पाटील यांनी सांगून कंपन्यांचे प्रदूषण कोणी बघत नाही मात्र मूर्तीच्या माध्यमातून प्रदूषणाकडे बघितले जाते ही चुकीची गोष्ट असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.

    पीओपी बंदीमुळे गणपती कारखानदार आणि त्यावर निगडित असणारे लाखो हात बेरोजगार होणार असून गणेशोत्सवातून प्रदूषण होत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर राज्यातील कंपन्यांमार्फत जे प्रदूषण होत आहे ते तुम्हाला का दिसत नाही असा सवाल महाराष्ट्र गणेश मूर्तिकार संघटना अध्यक्ष अभय म्हात्रे यांनी यावेळी केला. यासंदर्भातील अहवाल वेळेत न दिल्याने ही वेळ आल्याचा आरोप मूर्तीकारांनी केला आहे. सरकारने याबाबत वेळीच योग्य भूमिका घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed