Manoj Jarange Patil on Dhananjay Munde : मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
परभणी येथील डॉक्टर जगदीश शिंदे यांच्या जीवन हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील हे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.
कल्याण – डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये चाकू हल्ला, सकाळीच्या वेळी भरगर्दीत काय घडलं?
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यामध्ये असलेले सरकार हे मृत सोमनाथ सूर्यवंशी असो, की संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय देणार नाही. कारण संतोष देशमुख यांच्या खुनानंतर अद्याप पोलिसांनी कोणालाही सह आरोपी केले नाही. त्याचबरोबर काही आरोपी अद्यापही फरार आहेत. सध्या साध्या गोष्टीवरून ईडीची चौकशी लावणाऱ्या या सरकारने वाल्मीक कराडची मात्र ईडीची चौकशी लावली नाही. चार्जशीट दाखल करण्यात आली नाही, असे म्हणत सरकार या दोन्ही कुटुंबीयांना न्याय देईल की नाही याविषयी शंका असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
दिल्लीच्या मुख्यमंत्री निवड झाल्यानंतर रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या ‘मी दिल्लीतील प्रत्येक नागरिकाच्या…’
आम्ही सूर्यवंशी आणि देशमुख कुटुंबीयांच्या भक्कम पाठीशी
सरकार विषयी संशय व्यक्त करत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे असल्याचेही ते म्हणाले. या दोन्ही कुटुंबांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, तर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा लढाई लढू आणि न्याय मिळवून देऊ असा विश्वासही मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
एकीकडे अंजली दमानिया दररोज मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात वेगवेगळे पुरावे समोर करून भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत आणि त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत आहेत. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरून सडकून टीका केली आहे. त्यामुळे आता तरी हे सरकार मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेईल का हे पाहावे लागणार आहे.

