जयंत पाटील सभागृहात नाही पण भविष्यात त्यांची जागा चित्रलेखा पाटील घेतील- राजू शेट्टी
शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठविण्याची संधी जयंत पाटील यांच्या माध्यमातून विधान परिषदेत मिळाली. शेतकरी, कार्यकर्ते यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात जयंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. रायगडच नव्हे, तर संपुर्ण राज्याल जयंत पाटील आधारस्तंभ होते. दुर्देवाने ते सभागृहात नाही. त्यांची जागा भविष्यात चित्रलेखा पाटील घेतील. असे प्रतिपादन स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी कुरुळ येथे आयोजित पीएनपी चषकाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
