• Thu. Jun 11th, 2026

    Mumbai BEST Bus: फुकट्यांवर ‘बेस्ट’चा बडगा; २ वर्षांत पावणेतीन लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

    Mumbai BEST Bus: फुकट्यांवर ‘बेस्ट’चा बडगा; २ वर्षांत पावणेतीन लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

    Mumbai BEST Bus: सन २०२३ आणि २०२४ आणि जानेवारी २०२५ या कालावधीत एकूण दोन लाख ८४ हजार २४७ विनातिकीट प्रवासी आढळले आहेत. या प्रवाशांकडून ‘बेस्ट’ने पावणेदोन कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    mumbai best bus

    मुंंबई : तिकीट तपासनीसांचे कमी मनुष्यबळ, विनावाहक वस नियोजनाचा अभाव इत्यादी कारणांमुळे बेस्ट बसमधील विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे ‘बेस्ट’च्या महसुलावरही परिणाम होत आहे. सन २०२३ आणि २०२४ आणि जानेवारी २०२५ या कालावधीत एकूण दोन लाख ८४ हजार २४७ विनातिकीट प्रवासी आढळले आहेत. या प्रवाशांकडून ‘बेस्ट’ने पावणेदोन कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

    करोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर आणि मुंबईतील विविध सेवा पूर्वपदावर आल्याने बेस्ट गाड्यांनाही गर्दी वाढू लागली आहे. सध्या दररोज ३५ लाखांहून अधिक प्रवासी ‘बेस्ट’ मधून प्रवास करतात. या प्रवासात अनेकदा विनातिकीट प्रवासीही असतात. विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी अनेकदा सराईतपणे हात दाखवून ‘पास’, असे म्हणत निसटण्याचा प्रयत्न करतात. तर, गर्दी असलेल्या बसमध्ये चढलेले अनेक प्रवासी दरवाजाजवळ उभे राहून तिकीट काढल्याशिवायच आपल्या थांब्यावर उतरण्याचा प्रयत्न करतात. या सर्वच प्रवाशांना पकडून दंड वसूल करण्याचा प्रयत्न तिकीट तपासनीसांच्या माध्यमातून ‘बेस्ट’ करत असते. मात्र प्रत्येक वेळीच ते शक्य होत नाही.
    गैरव्यवहारांचा ‘गाळउपसा’! मिठी नदीच्या घोटाळ्याची फाइल उघडली, १३०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
    वर्ष २०२३ आणि २०२४ तर जानेवारी २०२५मध्ये एकूण दोन लाख ८४ हजार २४७विनातिकीट प्रवासी आढळले. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ मध्ये एक लाख ६ हजार १३६ विनातिकीट प्रवासी आढळले. सन २०२४मध्ये यात मोठी वाढ झाली आणि एक लाख ६७ हजार ११० प्रवासी आढळले आहेत. जानेवारी २०२५ या नव्या वर्षातही विनातिकीट प्रवासी कमी झालेले नाहीत. जानेवारीत ११ हजार २ प्रवासी आढळल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.
    सर्वसामान्यांना मोठा दिलासा! तूरीसह हरभरा, उडीद डाळींचे दरही उतरले, जाणून घ्या नवे दर
    विनावाहक बससेवेचा प्रवाशांकडून गैरफायदा बेस्ट उपक्रमाने ऑक्टोबर २०१९मध्ये विनावाहक बससेवा सुरू केल्या. या बसमध्ये वाहक नसतो. बस थांब्यावरच उभ्या असलेल्या वाहकाकडून प्रवाशांना तिकीट दिले जाते. मधल्या थांब्यावर गर्दीच्या वेळी काही प्रवासी बसमध्ये प्रवेश करतात व सर्रास विनातिकीट प्रवास करतात. तर, काही वेळा बस थांब्यावरच तिकीट देण्यासाठी वाहक नसल्याने शेवटचा थांबा येईपर्यंत प्रवाशाला तिकीट मिळत नाही.
    कोथरुडमध्ये १२ दिवसांत ५४ डुकरांचा संशयास्पद मृत्यू; शरीरात आढळलेल्या घटकामुळे गूढ वाढलं
    दोन कोटींचा दंड वसूल
    विनातिकीट प्रवाशांमुळे बेस्टच्या महसुलावर परिणाम होत आहे. सन २०२३पासून ते जानेवारी २०२५पर्यंत एक कोटी ७४ लाख १६ हजार ११६ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
    ट्राफिक जाम होतेच कशी? तरुणाने थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली, नाशिकमधील घटना
    वर्ष दंडवसुली
    २०२३ — ६५ लाख ७६ हजार ३०४
    २०२४ — एक कोटी एक लाख ७३ हजार ९१६
    जानेवारी २०२५ — सहा लाख ६५ हजार ८९६ रुपये

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed