• Wed. Mar 11th, 2026

    कृषी विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, खरेदीतील वस्तू दमानियांनी ऑनलाइन मागवल्या, पण पुढे काय घडलं?

    कृषी विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, खरेदीतील वस्तू दमानियांनी ऑनलाइन मागवल्या, पण पुढे काय घडलं?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Feb 2025, 11:16 am

    सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला.जुलै २०२३-२४ या एका वर्षात २८० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्याचा आरोप केला.12 मार्चला एक जीआऱ निघाला, तेव्हा कृषी आयुक्त प्रविण गेडाम होते. नॅनो युरिआ, नॅनो डीएपीच्या 5 वस्तु खरेदीत मुंडेंनी भ्रष्टाचार केला. अजितदादा, शिंदेंची सही घेऊन मुंडेंनी ही स्कीम राबवली असं अंजली दमानिया म्हणाल्या. त्यानंतर अंजली दमानिया यांनी अ‍ॅग्रीबेग्री कंपनीकडून सगळ्या वस्तू ऑनलाइन मागवल्या. ज्या ऑर्डर दरवाज्यापर्यंत आल्या पण काही तांत्रिक अडचणी आल्याने कंपनीने… सगळ्या वस्तू परत मागवल्याचं कारण ऑनलाइन साईटच्या विक्रेत्यांनी दिलं. या सगळ्याबाबतचं बोलणं अंजली दमानिया यांनी रेकॉर्ड केलेलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed