• Sat. Mar 14th, 2026
    नव्यांना राम राम अन् निष्ठावंतांना थांब थांब! जळजळीत पत्र लिहून ठाकरेंना जय महाराष्ट्र

    विधानसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाककरे पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. पक्षाचे माजी आमदार, पदाधिकारी बाहेर पडत वेगळी वाट धरत आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे: विधानसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाककरे पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. पक्षाचे माजी आमदार, पदाधिकारी बाहेर पडत वेगळी वाट धरत आहेत. बहुतांश जणांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली आहे. ठाकरेंच्या पक्षाचे पुणे शहर उपप्रमुख राजेश पळसकर यांनी राजीनामा दिला आहे. पक्ष सोडताना त्यांनी एक पत्र लिहिलं आहे. आपल्या भावनांना त्यांनी पत्रातून वाट करुन दिली आहे.

    पुणे शहर उपप्रमुख राजेश पळसकर यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. ते ४० ते ५० कार्यकर्त्यांसोबत शिंदे गटात करणार प्रवेश आहेत. पळसकर २२ वर्षे शिवसेनेत कार्यरत होते. पण आता पक्षातील अवस्था ‘नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब’ अशी झाल्याचं म्हणत त्यांनी उद्धवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांचं पत्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
    ते त्यांनाच विचारा! मुंडेंच्या भेटीवरुन धसांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना तोंडावर पाडलं
    उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पळसकर यांचा राजीनामा; पत्रात नेमकं काय?

    एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये काम करत असताना वंदनीय मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सन २००२ साली कॉलेज जीवनात भारतीय विद्यार्थी सेनेचा सदस्य होऊन शिवसेना परिवारासोबत जोडलो गेलो. तेव्हापासून आजतागायत गेली २२ वर्षे पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या कोणत्याही अपेक्षा व लालसा न करता प्रामाणिकपणे पार पाडत आालो. साम दाम दंड भेद या नीतीने संघटना वाढीसाठी काम करत राहिलो.

    मागून आलेले अनेक जन पक्षाच्या माध्यमातून विविध घटनात्मक पदावर गेले, तरीही कोणतीही तक्रार न करता पक्षासाठी झटत राहिलो. हे करताना पक्षाच्या आांदोलनाचे अनेक गंभीर गुन्हेदेखील माझ्यावर दाखल होऊन अनेकदा तुरुंगावारीदेखील झाली.
    आम्ही साडे चार तास भेटलो, पण…; धस-मुंडेंच्या खळबळजनक भेटीवर बावनकुळे बरंच काही बोलले
    आजपर्यंत पक्षावर आलेल्या संकटकाळातदेखील निष्ठावंत म्हणून पक्षासोबत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात राजकीय महत्त्वाकांक्षा मनात ठेऊन काहीजण पक्षाची पदे, उमेदवाऱ्या मिळून कार्यभाग साधून निघून जात आहेत. अशा पक्षाशी निष्ठा नसलेल्यांना मोठ्या पदावर घेण्याचा नवीन पायंडा काही नेत्यांकडून पाडला जात आहे. सध्या संघटनेत “नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब” ही संकल्पना काही नेते राबवित आहेत, ते माझ्यासारख्या शिवसैनिकाला न पटणारे आहे. त्यामुळे आज शिवसेना पक्षातील पुणे उपशहरप्रमुख पदाचा राजीनामा देत आहेत. तूर्तास इतकेच.

    संघटनेमध्ये काम करत असताना सर्व मान्यवर नेते, संपर्क प्रमुख, राज्यातील पदाधिकारी व शिवसैनिक यांचे कायमच मार्गदर्शन व सहकार्य मिळत गेले, त्यांचा मी कायमच ऋणी राहीन.

    धन्यवाद..

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed