• Wed. Mar 11th, 2026
    लेक बँकॉकला रवाना, तानाजी सावंतांचा थेट फडणवीस, शिंदेंना फोन, पण…; महत्त्वाची माहिती समोर

    माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या लेकाचं कथित अपहरणनाट्य काल संध्याकाळी रंगलं. रात्री त्यावर पडदा पडला. लेकानं रोखण्यासाठी, माघारी आणण्यासाठी तानाजी सावंत यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे: माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या लेकाचं कथित अपहरणनाट्य काल संध्याकाळी रंगलं. रात्री त्यावर पडदा पडला. लेकानं रोखण्यासाठी, माघारी आणण्यासाठी तानाजी सावंत यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. सर्वसामान्यांसाठी काम करताना कुचराई करणारे अधिकारी, कर्मचारी काल मात्र वेगात काम करताना दिसले. बड्या मंडळींसाठी यंत्रणा किती तत्पर असते, याचा अनुभव काल पुन्हा एकदा आला. काल घडलेल्या घटनाक्रमातील आणखी काही गोष्टी आज उघडकीस आल्या आहेत.

    तानाजी सावंत यांनी त्यांचा मुलगा ऋषिराजला पुण्यात परत आणण्यासाठी त्यांचं राजकीय वजन वापरलं. हा संपूर्ण घटनाक्रम मोठा रंजक आहे. ऋषिराजनं मित्रांसोबत बँकॉकला जाण्याचा प्लान केला. त्यासाठी त्यानं चार्टर्ड प्लेनचं बुकिंग केलं. विमानाच्या बुकिंगसाठी ग्लोबल हँडलिंग सर्व्हिसेसला ६८ लाख रुपये मोजले. ऋषिराज काही दिवसांपूर्वीच दुबईहून परतला होता.
    लेक मित्रांसह गेलेल्याची कल्पना, तरी सावंतांनी अपहरणाची तक्रार का दिली? आतली बातमी समोर आली
    ऋषिराजच्या बँकॉक ट्रिपला वडील तानाजी सावंत आणि ऋषिराजच्या पत्नीचा विरोध होता. पण कुटुंबाचा विरोध झुगारुन ऋषिराज बँकॉकसाठी रवाना झाला. पुण्याच्या लोहगाव विमानतळावरुन संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास विमानानं उड्डाण केलं. विमान रोखण्यासाठी तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. पण त्या दोघांकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.

    यानंतर तानाजी सावंत यांनी भाजप आमदार शंकर जगतापांकडे धाव घेतली. शंकर जगतापांमार्फत मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाल्यानंतर वेगानं सूत्रं हलली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुणे पोलीस, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निरोप देण्यात आला. पोलिसांना कार्यवाही करता यावी यासाठी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मोहोळ यांच्याकडून डीजीसीएला कार्यालयाला सूचना देण्यात आल्या.
    माघारी फिरा! पायलटला सूचना; सावंतांच्या मुलाला परत आणण्यात बड्या नेत्याची महत्त्वाची भूमिका
    चार्टर्ड प्लेनच्या वैमानिकाशी संपर्क होईपर्यंत विमान बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचलं होतं. १८ जणांची आसन क्षमता असलेल्या विमानात केवळ ऋषिराज आणि त्याचे दोन मित्र होते. विमानानं तातडीनं माघारी आणण्याचे आदेश वैमानिकाला देण्यात आले. त्यानंतर त्यानं हवेतच यूटर्न घेतला. रात्री पावणे नऊच्या सुमारास विमान पुण्यात पुन्हा लँड झालं.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    येवला औद्योगिक वसाहतीमध्ये मूलभूत सोयीसुविधांची तत्परतेने  उपलब्धता करावी – अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ – महासंवाद
    कोपरगाव-येवला-मनमाड चौपदरी काँक्रिट रस्त्यासह येवला शहर बायपास रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तत्परतेने सादर करावा – मंत्री छगन भुजबळ    – महासंवाद
    जलजीवन मिशन प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्णत्वास न्यावी-अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed