• Sat. Mar 7th, 2026

    ओमानच्या समुद्रात मर्चंट नेव्हीचा यश देवरे बेपत्ता, कुटुंबात चिंतेचे वातावरण

    ओमानच्या समुद्रात मर्चंट नेव्हीचा यश देवरे बेपत्ता, कुटुंबात चिंतेचे वातावरण

    धुळे जिल्ह्यातील देऊर गावातील मर्चंट नेव्हीत कार्यरत तरुण यश देवरे समुद्रात पडून बेपत्ता झाला आहे. कंपनीने कुटुंबियांना बेपत्ता असल्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतर उडवाउडवीची उत्तरे कंपनीकडून दिली जात आहेत. यशच्या कुटुंबिय चितेंत आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अजय गर्देधुळे : धुळे जिल्ह्यातील देऊर गावातील मर्चंट नेव्हीत कार्यरत असलेला तरुण बेपत्ता झाला आहे. यामुळे मोठी खळबळ निर्माण झालीये. कंपनीने कुटुंबियांना फोन करून त्यांचा मुलगा बेपत्ता असल्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतर आता कंपनीकडून कुटुंबियांना उडवाउडवीचे उत्तर दिली जात आहेत. मुलगा बेपत्ता होऊन तब्बल बारा दिवस उलटल्याने कुटुंबिय तणावात आहेत. अनेकदा फोन करूनही मुलाची माहिती मिळत नाहीये. समुद्रात पडल्याने यश हा बेपत्ता झाल्याचे सांगितले जातंय.

    ओमानहुन जहाजाने अलंग येथे निघाला असता झाला बेपत्ता

    यश देवरे असे या तरुणाचे नाव असून तो स्वराज मराईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ओएस पदावर कार्यरत आहे. यश देवरे हा ओमानहुन जहाजाने अलंग येथे येण्यास निघाला होता. मात्र, ओमान जवळील समुद्रात तो पडून बेपत्ता झाल्याचे सांगितले जातंय. याबद्दलची माहिती कंपनीने फोन करून कुटुंबियांना दिली. मात्र, त्यानंतर पुढे कोणतीही माहिती कुटुंबियांना कंपनीकडून दिली जात नाहीये.
    जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धसांमध्ये जुंपली, आव्हाडांनी केला गंभीर आरोपकंपनीकडून दिली जात आहेत उडवाउडवीचे उत्तरे

    यशच्या कुटुंबियांनी संबंधित जहाजासह कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तर दिले जात आहेत, अशी तक्रार यशच्या कुटुंबियांनी केली आहे. यशला बेपत्ता होऊन बारा दिवस होऊन गेले आहेत. पण त्याच्याबद्दल कोणतीही माहिती कुटुबियांना मिळाली नसल्याने संपूर्ण कुटुंबाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आमचा मुलगा कुठे आहे? हा प्रश्न कुटुंबियांकडून उपस्थित केला जात आहे.

    ओमानच्या समुद्रात मर्चंट नेव्हीचा यश देवरे बेपत्ता, कुटुंबात चिंतेचे वातावरण, कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे

    मुलगा बेपत्ता संपूर्ण कुटुंब तणावात

    दरम्यान या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाला ईमेल केले असून सरकारने यशला परत आणण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी यश देवरेच्या कुटुंबियांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कराड नावाचा मुलगा देखील जहाजावरून बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी मुलगा मिळावा, याकरिता अनेक प्रयत्न केले. शासनाकडे देखील कराड कुटुंबियांनी मदत मागितली होती. आता यश देवरे प्रकरणात कुटुंबियांना सरकारकडून काय मदत केली जाते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed