Authored byमानसी देवकर | Contributed byजयंत सोनोने | महाराष्ट्र टाइम्स.कॉम8 Feb 2025, 4:32 pm
दिल्ली निवडणुकीतील भाजपच्या विजयावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणांनी अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. खोटं राजकारण करणाऱ्या गांधी, केजरीवालांना दिल्लीकरांनी उत्तर दिलं असं राणा म्हणाल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे अभिनंदनही केले.