• Thu. Jun 11th, 2026

    वर्षा बंगल्यावर काय घडवलंय? अमृता वहिनींना का जावंसं वाटत नाही, राऊतांच्या प्रश्नांनी खळबळ

    वर्षा बंगल्यावर काय घडवलंय? अमृता वहिनींना का जावंसं वाटत नाही, राऊतांच्या प्रश्नांनी खळबळ

    Sanjay Raut on Varsha Bungalow : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही वर्षा बंगल्यावर स्थलांतर केलेले नाहीत. संजय राऊत यांनी वर्षा बंगल्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणतात की वर्षा बंगला पाडून नव्याने बांधणार आहेत. राऊत यांनी फडणवीसांना बंगल्यावर न जाण्याचे कारण विचारले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला चर्चेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. वर्षा बंगला पाडून त्या ठिकाणी नवीन बांधण्याचं ठरवल्याची माहिती मला मिळाल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. त्यासोबतच फडणवीसांना राहायला जायला कशाची भीती वाटतेय असा सवाल राऊतांनी केला.

    रामदास कदम हे स्वामी रामदास नाहीयेत ज्यांचं ऐकलं पाहिजे. काळ्या जादूविषयी कोणी बोलायचं, मुळात ही अंधश्रद्धा आहे. यासंदर्भात कोणी बोलत असेल तर अंधश्रद्धा निर्मुलन जो कायदा आहे त्यांनी कारवाई केली पाहिजे. माझा प्रश्न इतकाच होता की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाहीत याचं उत्तर कदम, शिंदे किंवा भाजपच्या प्रवक्त्यांनी द्यावं. फडणवीसांचं कुटुंब वर्षावर जायला का घाबरतायेत? हा साधा प्रश्न आहे. मी म्हटलं का तिथे लिंबू, मिरच्या आहेत, नाही. त्यांनी जायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला आहे. रात्री झोपायला तयार नाहीत, असं तिकडे काय आहे, कसली भीती वाटतेय? तिकडे असं काय घडलंय किंवा घडवलंय. हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    वर्षा बंगल्याची प्रतिष्ठा का गेली? मुख्यमंत्रीपद आणि वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी धडपडतात. कधीतरी माझं एक स्वप्न आहे त पूर्ण व्हावं मी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री बनून जावं. हे प्रथमच पाहत आहे की देवेंद्र फडणवीस यांचा वर्षामध्ये पाय पडत नाहीये. अमृता वहिनींना का जावस वाटत नाहीये, हे का चाल्लंय मला कळत नाहीये. अनामिक भीतीने मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललं आहेय. असं काय घडलंय? वर्षा बंगला पाडून नवीन बांधण्याचं ठरवलं आहे. माझ्याकडे माहिती आहे, संपूर्ण खोदकाम करून पाडून नव्याने उभं करायचं चाललं असल्याचा गौप्यस्फोट केलाय.

    जेव्हा नवीन मुख्यमंत्री जातो तेव्हा रंगरंगोटी करावी लागतो. आपण धार्मिक लोकं आहोत, एखादी लहानशी पूजा आपण करतो त्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढाच लागला होता. सह्याद्री अतिथिगृह हे तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान होतं, तेही नंतर पाडलं आणि नव्याने काम सुरू केलं. देशभरातील पंडित महाराज आणून त्या जागेची शांत केली आणि ती इमारत उभी राहिल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed