Nandurbar Red Radish Farming : नंदुरबारमध्ये किडनी आणि पोटाचा विकारासाठी लाभदायी असणाऱ्या लाल मुळ्याची शेती यशस्वीरित्या केली जात आहे. या मुळ्याला मोठी मागणी असून याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
४० दिवसांत लाल मुळ्याची यशस्वी शेती, ८० रुपये किलोने होतेय विक्री; औषधी फ्रेंच ‘मुळा’ला मोठी मागणी
आपण जेवणामध्ये प्रामुख्याने पांढरा मुळा हा खाण्यासाठी वापरतो. मात्र, लाल मुळा हा फारच कमी लोकांनी पाहिला असेल. या लाल मुळ्याची लागवड अनेकांना आश्चर्यचकित करू शकते. अशा या लाल मुळ्याची शेती नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. अर्ध्या गुंठ्यामध्ये त्यांनी लाल मुळ्याची लागवड केली. एकरी पाच किलो बियाणे लागते. अडीचशे रुपये दराने एक पाकीट मिळते. हिवाळ्याच्या दिवसातच याची लागवड करता येते.
कमी खर्चात, खडकाळ जमिनीतून वर्षाला १५ लाखांचं उत्पन्न; पारंपरिक शेतीसह फळ लागवडीने शेतकरी मालामाल
लाल मुळ्याला फ्रेंच मुळा म्हणून ओळखले जाते. लाल मुळा हा पांढऱ्या मुळ्याप्रमाणेच असतो. या मुळ्याची चव देखील पांढऱ्या मुळासारखीच असते. त्याचबरोबर यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स आढळतात. जिथे बाजारात सामान्य मुळा १० ते २० रुपये किलोने भाव मिळतो. त्यातच हा लाल मुळा ८० ते १०० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला लाल मुळा किडनी आणि पोटाचा विकारासाठी लाभदायी आहे. या लाल मुळ्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग असून यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.
कुंभमेळामुळे नांदेडच्या केळीला तिप्पट भाव, व्यापारी वर्गात आनंद; दररोज ८० टनहून अधिक निर्यात
एकरी ५५ क्विंटल पर्यंतचे उत्पादन
डिसेंबर ते फेब्रुवारी हा महिना लाल मुळ्याची लागवडीसाठी अतिशय योग्य मानला जातो. लागवडीसाठी निचरा होणारी जमिन उत्तम मानली जाते. लाल मुळ्याची लागवड बियांची पेरणी करुन किंवा नर्सरीत रोपे वाढवूनही करता येते. पेरणीसाठी सुमारे ८ ते १० किलो बियाणे लागते. व्यावसायिक लागवडीसाठी रोप वाटिका वाढवलेल्या सुधारित वाणांची निवड करावी.
४० दिवसांत लाल मुळ्याची यशस्वी शेती, ८० रुपये किलोने होतेय विक्री; औषधी फ्रेंच ‘मुळा’ला मोठी मागणी
पेरणीनंतर साधारण २० ते ४० दिवस लागतात. एकरी ५४ क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळू शकते. शेती व्यवसयातून केवळ मुख्य पिकातूनच उत्पन्न मिळते असे नाही. काळाच्या ओघात पीक पद्धतीमध्ये बदल होत आहे. शेतकरी हे देखील नगदी पिकावरच भर देत आहेत. भाजी पाल्याच्या लागवडीतून कमी काळात अधिकचे उत्पन्न हे सहज शक्य असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे कृषी तज्ञ डॉ. वैभव गुरवे यांनी दिली आहे.

