महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यानं नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची नाराजी पुन्हा एकदा उघडपणे बोलून दाखवली आहे.
मला राज्यपाल करणं हा माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. राज्यपाल होऊन मी काय करु, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळ नाराज आहेत. त्यांना राज्यसभेवर किंवा राज्यपालपदी संधी देण्याबद्दल महायुतीत चर्चा सुरु असताना भुजबळांनी याबद्दलची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.
ते आमदारही आमच्या संपर्कात होते, पण आम्ही भाजपला..; शिंदेंनी मोठा धमाका करण्याची संधी सोडली?
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. राज्यपाल होऊन मी काय करु, असा प्रश्न त्यांनी केला. माझं काम गोरगरिबांच्या अडचणी सोडवणं आहे. त्यांच्यासाठी भांडणं आहे. राज्यपाल झाल्यावर मी त्या समस्या, ते प्रश्न सोडवू शकणार आहे का? मला राज्यपालपदाचा अपमान करायचा नाही. पण मी असा मोकळा ठीक आहे, असं म्हणत भुजबळांनी आपापल्या राज्यपालपद नको असल्याचं स्पष्ट केलं.
लोकसभा निवडणुकीवेळी घडलेल्या घडामोडींचा पुनरुच्चार त्यांनी केला. ‘नाशिकमध्ये तुम्ही चांगलं काम केलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तुम्हालाच उभं राहावं लागेल, असं मला सांगितलं होतं. पण महिना उलटून गेला तरीही माझं नाव जाहीर झालं नाही. त्यामुळे मग मीच निवडणुकीतून माघार घेतली,’ याचा पुनरुल्लेख भुजबळांनी केला. लोकसभा निवडणुकीत महायुतीत नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेनं लढवली होती.
शिंदेंमुळे सारेच ताटकळले; उद्धवसेनेच्या आमदारांकडून तक्रारींचा पाढा; पण चर्चा आदित्य ठाकरेंची
‘लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली. तेव्हा मी राज्यसभेवर जातो, असं म्हणालो होतो. पण लोकसभा निवडणुकीत पडलेल्या सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. दुसरी राज्यसभा आली तेव्हा नितीन पाटलांना पाठवण्यात आलं. त्या व्यक्तीला मी ओळखतही नाही,’ असं भुजबळ म्हणाले.

