Produced byविश्रांती शिंदे | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम29 Jan 2025, 8:53 pm
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. सकाळी प्रेसमधून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता.पण अल्मिमेटम संपताच जरांगेंनी सायंकाळी पुन्हा प्रेस घेत फडणवीसांवर टीका केली. फडणवीस तुम्ही बेईमानी, गद्दार. तुमचं गप्प बसणंच सगळं सांगून जातं.तुम्ही चांगलं केलं नाही, जे केलं ते वाईट आहे, शेवटी इकडे मनोज जरांगे आहे. मी मराठ्यांचं ओरिजिनल पिल्लू, माझी नियत मराठ्यांशी बांधलेली आहे. फडणवीस तुम्ही मराठ्यांचे मनं जिंकायला हवे होते. पण नाही केलं तुम्ही तसं. पडलेल्या आड्या, गाठी सुटतील असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही.