• Tue. Jun 16th, 2026
    मुंबई ते उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरला जोडणारा महामार्ग लवकरच; MMRDA चा मोठा निर्णय

    MMRDA to Build Mumbai Connecting to Badlapur Ambernath : एमएमआरडीए लवकरच मुंबई ते बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण या शहरांना जोडणारा महामार्ग लवकरच उभारणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : मुंबई उपनगरातून मुंबईत नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये एक महामार्ग उभारण्यात येणार आहे. हा मार्ग मुंबई, नवी मुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरला जोडेल.

    डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या उपनगरांमध्ये वेगात लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. हा नवा महामार्ग येथील नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरेल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने मर्यादित प्रवेश महामार्गाच्या बांधकामासाठी नुकतीच निविदा काढली. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी ही निविदा काढण्यात आली आहे.
    मुंबईत पेट्रोल – डिझेलच्या वाहनांवर बंदी येणार? राज्य सरकारकडून मोठा निर्णय

    महामार्गावर असणार इंटरचेंज

    रिपोर्टनुसार, या महामार्गाची सुरुवात मुंबई – दिल्लीदरम्यान बदलापूरपासून होईल. यात मुंबई – वडोदरा मार्ग, कटाई – बदलापूर आणि कल्याण रिंग रोडचा समावेश असेल. या महामार्गाचा पहिला इंटरचेंज अंबरनाथमधील पालेगावात असेल. तर दुसरा इंटरचेंज कल्याण पूर्वेतील हेदुटणेमध्ये असेल. हा मार्ग कल्याण रिंग रोड आणि कल्याण शिळफाटा रोडला जोडेल.
    Atal Setu : अटल सेतूवरील टोलबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, किती पैसे मोजावे लागणार? पुढील एक वर्षभर…
    महत्त्वाची बाब म्हणजे, या महामार्गामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई एयरपोर्ट इन्फ्युएन्स नोटिफाइड एरिया अर्थात NAINA याची कनेक्टिव्हिटी सोपी होईल. हा मार्ग नवी मुंबई आणि मुंबई उपनगरातील अंतर कमी करण्यास मदत करेल. त्याशिवाय यामुळे ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल.

    ८ लेन असणाऱ्या या महामार्गावर ताशी ८० किमी वेगाने वाहन चालवता येतील. या महामार्गाबाबतचा रिपोर्ट ३१ जानेवारी रोजी देण्यात येणार आहे. तर टेंडरसाठी १७ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन अर्ज करता येतील.

    मुंबई ते उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरला जोडणारा महामार्ग लवकरच; MMRDA चा मोठा निर्णय

    महामार्गात तीन टनल

    या महामार्गात तीन टनल असतील, तर पाच अंडरपास असतील. महामार्गाची लांबी २० किमी असेल. तसंच चार इंटरचेंज असणार आहेत. या महामार्गाच्या उभारणीसाठी २०० हेक्टर जमीन द्यावी लागणार आहे. तर यासाठीचा अंदाजे खर्च १०,८३३ कोटी रुपये असेल.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed