Produced byविश्रांती शिंदे | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम26 Jan 2025, 7:22 pm
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आले होते. भेटीनंतर त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनासह बीड घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सरकारमधील एक आमदार म्हणून हा विषय लवकर संपवणं काळाजी गरज आहे. यावेळी बोलताना बीड प्रकरणावर ते म्हणाले, बीडचा बिहार होतोय ही अत्यंत दुर्दैवी आहे.ज्यावेळेस मुंबईकडे जातो तेव्हा बीडचा आहे म्हटल्यावर लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. हे असं चित्र काही लोकांनी निर्माण केलंय, ते असं व्हायला नको असंही ते म्हणाले.