Produced byविश्रांती शिंदे | Contributed byऋषिकेश होळीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम26 Jan 2025, 8:44 pm
गरिबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केल्याचा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी वक्तव्य केलं. यावर आमदार आणि लातूर पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र हे समृद्ध राज्य आहे, महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा गरीब नाही. भाजपाचे सर्व निर्णय आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेत असतात. यावेळी बोलताना त्यांनी बीड प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मसाजोक प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही. दोशींवर कठोर कारवाई होईल असे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.