बांगलादेशी नागरिकांचा फायदा निवडणुकीत महाविकास आघाडीला – किरीट सोमय्या
महाराष्ट्रातील बांगलादेशी नागरिकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा, मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या अनुषंगाने किरीट सोमय्या यांनी आज , नागपूर , यवतमाळ आणि अकोला येथे महसूल विभागाची बैठक घेतली. अकोल्यात किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. या बांगलादेशी नागरिकांचा फायदा निवडणुकीत महाविकास आघाडीला झाला असल्याचं त्यांनी म्हंटलं. तर बांगलादेशी नागरिकांना भारतात जन्म प्रमाणपत्र मिळवून देण्याचा राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा राजकीय फायदा असल्याचंही ते म्हणाले.
