Produced byविश्रांती शिंदे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम27 Dec 2024, 6:53 pm
जळगाव जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती दोन पीकं म्हणजे केळी आणि कापूस… पण सध्या शेतकऱ्यांना केळी आणि कापूस उत्पादनातून फारसे काही उत्पन्न मिळत नाही ही वारंवार शेतकऱ्यांची तक्रार असते… मात्र, इथल्याच एका केळी आणि कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्याने त्याच्या शेतात फळांचे उत्पादन करत लाखोंची कमाई केली आहे. केळी आणि कापूस या पारंपारिक पिकाची लागवड केल्यानंतर खर्च वजा जाता त्यांच्या हातात काहीही शिल्लक राहत नव्हतं. मात्र त्यांनी पेरूची लागवड केली… आणि त्यांचं नशीबच चमकलं. संदीप गुजर हे चोपडा तालुक्यातील धानोरा इथले तावसे गावचे रहिवासी आहेत. तसे ते एसी मेकॅनिक आहेत. पण त्यांचं पहिलं प्राधान्य शेतीला असतं. त्यांचे आई-वडील आणि पत्नी त्यांना शेती कामात मदत करतात. पारंपरिक पद्धतीने शेती करणं फायद्याचं नाही, हे त्यांनी वेळीच ओळखलं. केळी, कापसाला पर्याय म्हणून त्यांनी शेतात पेरूची लागवड केली. पहिल्याच वर्षी त्यांना फायदाच फायदा झाला. विशेष म्हणजे, पेरूच्या विक्रीसाठी त्यांना व्यापाऱ्यांचे पाय धरावे लागले नाही. स्थानिक बाजारपेठेत त्यांनी स्वतः पेरू विकला. ते या सगळ्याविषयी काय म्हणालेत ऐकुयात….