Chandrashekhar Bawankule : वक्फ बोर्डाने अतिक्रमण केलेल्या, जबरदस्तीने घेतलेल्या जमीन सर्व मूळ मालकांना परत केल्या जातील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
बावनकुळेंकडून वक्फ बोर्डाच्या जमिनीचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता राष्ट्रीय पातळीवर स्वामित्व योजनेचा प्रारंभ केला जाणार आहे. याबाबत माहिती देताना बावनकुळे यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीचा उल्लेख केला.
मुंबई-ठाण्यात धावणार केबल टॅक्सी, नव्या परिवहन मंत्र्यांकडून प्रवाशांसाठी Good News, नव्या प्रयोगाचे प्रवाशांसाठी काय फायदे?
वक्फने जबरदस्ती घेतलेल्या जमिनी मूळ मालकांना परत करणार
वक्फने खासगी, धर्मदाय, शिक्षण, सांस्कृतिक संस्थांच्या मालमत्ता जबरदस्तीने स्वत:च्या नावे केल्या. अशा मालमत्तांबाबत केंद्राचा कायदा येत आहे. राज्यात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. ही मालमत्ता मूळ मालक, संस्थांना परत मिळावी, अशी सरकारची भूमिका आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
महत्वाकांक्षी स्वामित्व योजना जाहीर, आदिवासींना होणार फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाकांक्षी स्वामित्व योजना जाहीर केली असून, राज्यातील ३० जिल्ह्यातील ३० हजार ५१५ गावात मालमत्ताधारकांना डिजिटल प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. या योजनेमुळे अनेकांना मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह सर्व मंत्री या कार्यक्रमात सहभागी होतील, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
अमेरिकेत भारतीयांची तस्करी, ईडीकडून कॅनडातील कॉलेजबाबत धक्कादायक बाब समोर; प्रकरण काय?
आदिवासी भागात कुणाकडे मालमत्तेचे दस्तावेज नाही. मालमत्तेच्या डिजिटल कार्डमुळे गावकऱ्यांची आर्थिक पत वाढेल. कर्जासह केंद्र व राज्याच्या ४५ योजनांच्या लाभासाठी हे कार्य उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
भूखंडांना नियमित करणार
हुडकेश्वर व नरसाळा महापालिका हद्दित आले आहेत. येथील भूखंडांना नियमित करण्यात येईल. बेसा-बेलतरोडी नगरपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध लेआऊट्स तयार झाले. नगरपंचायतमुळे गुंठेवारी नियम लागू होतो. त्यानुसार नियमितीकरणाची प्रक्रिया करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

