Jal Jeevan Mission Scheme: जिल्ह्यातील १३८५ गावांपैकी १२३९ ठिकाणी ‘जलजीवन’ मिशन योजना राबविण्यात येत आहे. त्या योजनेला गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरुवात झाली आहे. मात्र, आजमितीला जिल्ह्यात योजना ४९६ गावांमध्ये घराघरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे
जिल्ह्यातील १३८५ गावांपैकी १२३९ ठिकाणी ‘जलजीवन’ मिशन योजना राबविण्यात येत आहे. त्या योजनेला गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरुवात झाली आहे. मात्र, आजमितीला जिल्ह्यात योजना ४९६ गावांमध्ये घराघरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षे पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या महिलांसह ग्रामस्थांची वणवण थांबली आहे. त्यांना पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. उर्वरित योजनाही आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
■ जलस्रोतांना प्राधान्य
पुणे जिल्ह्यातील पूर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या आणि पूर्ण झालेल्या योजनांपैकी अशा सुमारे १६८ जलस्रोत फेब्रुवारी महिन्यात बंद अस्थेत होते. मात्र, त्यापैकी गेल्या दहा महिन्यांत १३१ जलस्रोत पुन्हा कार्यान्वित करण्यात पाणी पुरवठा विभागाला यश आले आहे. ‘जलजीवन’ योजनेचे काम सुरू करताना अनेकदा कंत्राटदारांकडून जलस्रोतांऐवजी इतर कामांवर भर दिला जातो. जिल्ह्यात विहिरी, बोअरवेल, नदी, धरण, तलाव, जॅकवेल यासारखे ८०९ जलस्रोत आहेत. काम पूर्ण होऊनही स्रोत बंद असल्याने योजना अर्धवटच आहेत. यासारख्या उपाययोजना गेल्या दहा महिन्यांमध्ये करण्यात आल्याने बंद अवस्थेतील १६८ पैकी डिसेंबर महिन्यात आतापर्यंत १३१ इतके जलस्रोत कार्यान्वित करण्यात यश आले आहे. उर्वरित ३७ जलस्रोत कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Sudhir Mungantiwar: १३पर्यंत पक्के होते, १५ला नाव कटले! मंत्रिपदाबाबत सुधीर मुनगंटीवार यांचा गौप्यस्फोट
■ मार्चअखेर योजना पूर्णत्वास
पुणे जिल्ह्यात आजमितीला ४९६ पाणी योजना पूर्ण झाल्या असून त्यामुळे घराघरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. सध्या ४६१ योजनांचे फक्त २५ टक्के काम बाकी असून येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यत त्या पूर्ण होतील, अशी शक्यता पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तविली.
३६१ प्रस्तावांचे ‘डीपीआर’ तयार
सद्यस्थितीत सुमारे ७८९ योजनांचे सुधारित विकास आराखडे (डीपीआर) करण्याची वेळ पाणीपुरवठा विभागावर आली होती. तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी घेऊन अंतिम मंजुरीसाठी हे प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात येत आहेत. त्या प्रस्तावांना जिल्हा परिषदेकडून सुधारित खर्चानुसार अंतिम मंजुरी घेण्यात येत आहे. त्यामुळे योजनांचा खर्चही पूर्वर्वीपेक्षा वाढणार आहे. ७८९ पैकी ७६९ योजनांचे तांत्रिक बाबींमुळे, तर काहींचे जीएसटीच्या खर्चामुळे सुधारित डीपीआर करावे लागले आहेत. सध्या ३६१ योजनांचे ‘डीपीआर’ तयार असून, पैकी १८६ योजनांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. विविध प्रक्रिया पूर्ण करून १६८ योजनांचे सुधारित ‘डीपीआर’चे प्रस्ताव हे सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी ‘मटा’ला दिली.
Pune Crime: पुण्यात डान्स टीचरचा चार मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, वर्गात ‘तो’ शब्द ऐकला अन् प्रकार उघड
कसे वाढले पाणी ?
■ गेल्या दहा महिन्यांत अन्य कामांऐवजी जलस्रोत पुन्हा वाहते करण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे.
■ काही ठिकाणी विहिरी असून, तेथे पाणी वाढावे यासाठी बोअर खोदण्यात आले.
■ धरणांजवळ विहीर खोदण्यात आल्याने पाण्याचा पाझर वाढला. त्यामुळे विहिरी आटत नाहीत.
■ नदी, तलावांजवळ जॅकवेल बांधण्यात आले.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे पुन्हा लांबणीवर; GMRTमुळे रेल्वे मंत्रालयाने नाकारली परवानगी
जिल्ह्यात फेब्रुवारी अखेर ‘जलजीवन’च्या २२८ योजना पूर्ण झाल्या होत्या. त्या योजनांना गेल्या दहा महिन्यांत गती दिल्याने आता ४९६ गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दहा महिन्यांत दुप्पट योजना पूर्ण झाल्या. येत्या फेब्रुवारीपर्यंत आणखी ४६१ योजना पूर्ण होतील. त्यामुळे योजना कार्यरत झालेल्या गावांची संख्या हजारावर जाईल. –अमित पाथरवट, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

