Chhagan Bhujbal: फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नागपुरहून निघाले आहेत. नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना भुजबळ तिकडून नाशिकच्या दिशेनं रवाना झाले आहेत.
नागपुरात अधिवेशन सुरु असताना छगन भुजबळ नाशिकला निघाले आहे. ‘उद्या येवला, लासलगावला जाईन, कार्यकर्त्यांना भेटेन, त्यांच्याशी बोलून, मग काय ते ठरवेन,’ असं भुजबळांनी सांगितलं. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना भेटेन. नाशिकमधल्या कार्यकर्त्यांना भेटेन. अन्य जिल्ह्यांमधील लोकांशी बोलेन. त्यानंतर काय करायचं ते ठरवेन, असं भुजबळ म्हणाले.
Amit Shah: भाजप ‘शिंदे पॅटर्न’ रिपीट करण्याच्या तयारीत; शहांनी सांगितला प्लान, कोणाची खुर्ची धोक्यात?
मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानं भुजबळ नाराज आहेत. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरु आहेत. त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आलेली आहे. पण भुजबळ राज्यसभेवर जाण्यास तयार नाहीत. ते उद्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत. पुढील भूमिकेबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे भुजबळ नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
३३ वर्षांपूर्वी बंड, शपथ अन् आता डच्चू
छगन भुजबळांनी १९९१ मध्ये शिवसेनेत बंड केलं. त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत नागपूरचं अधिवेशन सुरु असताना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. भुजबळांचं बंड आणि त्यांनी घेतलेली मंत्रिपदाची शपथ त्यावेळी चर्चचं विषय होता. आता ३३ वर्षानंतर भुजबळ नागपूर अधिवेशन सुरु असताना पुन्हा एकदा मोठा निर्णय घेणार का, याची उत्सुकता आहे.
सावंतांनी बदलला डीपी, मंत्रिपद गेल्यानं नाराजी मोठी? धनुष्यबाण हटवला, नवा फोटो बराच बोलका
१९९१ मध्ये काय घडलेलं?
२१ डिसेंबर १९९१ रोजी नागपुरात मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. तेव्हा भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत वसुधा देशमुख, राजेंद्र गोडे, भरत बाहेकार, शंकर नम, जयदत्त क्षीरसागर, शालिनी बोरसे या सहा जणांनी उपमंत्रिपदाची शपथ घेतली होती. शपथविधी सोहळ्याच्या २ दिवस आधीच भुजबळांनी ११ आमदारांसह शिवसेना सोडली होती. त्यावेळी हिवाळी अधिवेशन सुरु होतं. भुजबळ आमि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात घेण्यात येईल अशी चर्चा त्यावेळी होती. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करायला मुख्यमंत्री नाईक १९ डिसेंबरच्या रात्री उशिरा नागपुरहून दिल्लीला गेले होते. २० डिसेंबरच्या सकाळी दिल्लीतून ते मुंबईला परतले. २० डिसेंबरच्या दुपारी नाईक यांनी त्यावेळचे राज्यपाल सुब्रमण्यम यांना नव्या मंत्र्यांची यादी दिली. त्यानंतर २१ डिसेंबरला भुजबळांसह सहा जणांचा शपथविधी झाला.

