सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यावरून खासदार बजरंग सोनवणेंनी बीडचा बिहार होत असल्याचं विधान केलं होतं. अशातच आमदार धनंजय मुंडेंनी देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य करत विरोधकांना सुनावलंय. बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, असं मुंडेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. तसेच हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावे अशी मागणी देखील त्यांनी केली.
‘बीडचा बिहार होतोय’, धनंजय मुंडे विरोधकांवर भडकले; सरपंच प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी
