• Mon. Sep 7th, 2026
Mumbai News: ‘टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी आहे का?’उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 Dec 2024, 5:04 pm

Mumbai News: असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला महाराष्ट्रातील बारामती येथे टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्याची परवानगी देण्यात आली नाही. यानंतर ओवेसी यांच्या पक्षाने या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला एमआयएमच्या याचिकेवर सुनावणी करताना असा प्रश्न केला आहे की, “या देशात टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यास बंदी घालण्यात आली आहे का? कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम आहे. तुम्ही मार्ग बदलू शकता” .
असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला महाराष्ट्रातील बारामती येथे टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्याची परवानगी देण्यात आली नाही. यानंतर ओवेसी यांच्या पक्षाने या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारला असे विचारले की, देशात टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यावर बंदी आहे का? या प्रश्नाला उत्तर देत महाराष्ट्र सरकारने टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी नसल्याचे म्हटले आहे.

कोर्टात नेमकं काय झालं?

“पोलिसांच्या म्हणण्यानुसार रॅलीचे आयोजन केल्याने बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतत कारण इतर समाजाने या रॅलीला विरोध केला आहे.” असे राज्य सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना अतिरिक्त सरकारी वकील क्रांती हिरवले म्हणाल्या.
एमआयएमशी संबंधित असलेल्या याचिकाकर्त्याच्या वतीने वकील तपन थत्ते आणि विवेक आरोटे यांनी त्यांच्या युक्तिवादात न्यायालयाला सांगितले की, या देशाच्या संविधानात राणी लक्ष्मीबाई आणि टिपू सुलतान यांचे चित्र आहे. त्यावरून न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने राज्यसरकारला विचारले की, या देशात टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यास बंदी आहे का? कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम आहे. तुम्ही मार्ग बदलू शकता. सरकारी वकिल क्रांती हिरवले यांनी उत्तर दिले कि, “नाही, बंदी नाही पण इतर समुदायांनी या रॅलीसाठी विरोध केला आणि गेल्या वर्षी याच मुद्द्यावर आम्हाला त्रास झाला होता, असे इतर समुदायांनी म्हटले .”

या प्रकरणात माननिय उच्च न्यायालयाने बारामतीच्या पोलीस अधीक्षकांना दुपारी 1 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्यास सांगितले आहे.

आशिष मोरे

लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन…. आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed