• Wed. Mar 11th, 2026

    पैसे नकोत, कारवाई करा; माझी आई… कुर्ला अपघाताने सारे हिरावून नेलं, लेकाचं दु:ख पहावेना

    पैसे नकोत, कारवाई करा; माझी आई… कुर्ला अपघाताने सारे हिरावून नेलं, लेकाचं दु:ख पहावेना

    Kurla Best Bus Accident: कुर्ला येथील बेस्ट बस अपघातात आपल्या आईला गमावलेल्या आबिद शेख यांनी हा अपघात यंत्रणांचं अपयश असल्याचं म्हटलं आहे. तसेच, पैसे नकोत आरोपीवर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: कुर्ला येथे घडलेल्या बेस्ट बस अपघातात सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कुर्ल्यातील एलबीएस रस्त्यावर ही भीषण घटना घडली. या अपघातात इलेक्ट्रिक बसने अनेकांना चिरडलं, त्यात ४९ जण जखमी झालेत. सध्या पोलिसांनी या प्रकरणातील बेस्ट बस चालक संजय मोरेला अटक केली असून न्यायालयाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    मृतांच्या कुटुंबीयांसाठी १० लाखांची मदत जाहीर

    या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी पाच लाखांची मदत जाहीर केली. तसेच, जखमींवर मोफत उपचार केला जाणार असल्याचंही सांगितलं. मात्र, रुग्णालयात काही वेगळंच चाललंय, अशी परिस्थिती आहे.
    Kurla Best Bus Accident: संजय मोरे दारु पित नाही, कुर्ला अपघात बस चालकाच्या कुटुंबांचा दावा, पोलिस तपासातही मोठी माहिती
    सरकारची पाच लाखांची मदत नको, दोषींवर कारवाई करा, अशी मागणी या अपघातात आपल्या आईला गमावलेल्या एका मुलाने केली आहे. या अपघातात ५५ वर्षीय कणिस फातिमा यांचाही मृत्यू झाला. त्या आपल्या कामावर जात असताना बसने त्यांना जोरदार धडक दिली आणि त्या बस आणि कारच्या मध्ये अडकल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घर सोडल्याच्या २० मिनटांतच हे सारं घडलं होतं. त्या कुर्ल्यातील देसाई रुग्णालयत काम करायच्या. त्यांची रात्रपाळी असल्याने त्या कामाला जात होत्या. तेवढ्यात या बेस्ट बसने त्यांना धडक दिली. त्या काम करत असलेल्या रुग्णालयासमोरच त्यांचा मृत्यू झाला.

    घरी मुलाच्या लग्नाची तयारी सुरु होती

    फातिमा यांच्या मुलाचं लग्न असलेल्याने घरी त्याच्या लग्नाची तयारी सुरु होती. मात्र, लेकाचं लग्न पाहण्यापूर्वीच फातिमा हे जग सोडून गेल्या. त्यांना दोन मुली आणि दोन मुलं आहेत.

    Kurla Accident: पैसे नकोत, कारवाई करा; माझी आई… कुर्ला अपघाताने सारे हिरावून नेलं, लेकाचं दु:ख पहावेना

    फातिमा यांचा मुलगा आबिद शेखला या घटनेने मोठा धक्का बसला आहे. त्याने प्रशासनाला यासाठी जबाबदार धरलं आहे. तसेच, आईचा मृतदेह नेण्यासाठीही आमच्याकडे पैसे मागण्यात आले, असंही आबिद शेख यांनी सांगितलं. तसेच, माझ्या आईचा मृत्यू हा अपघात नाही तर अनेक यंत्रणांचे अपयश आहे. त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed