• Sat. Mar 14th, 2026
    ‘सरकार कुणाचेही असो मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार,’ मनोज जरांगेंनी पुन्हा थोपटले दंड

    Manoj Jarange Patil on Maratha Protest Ahead: मनोज जरांगे पाटील यांनी आज तुळजापुरातील तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद घेतले आहेत. तर तुळजाभवानी मंदिरातून त्यांनी सरकारला इशारा देखील दिला आहे. सरकार कुणाचेही असले तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, असे म्हणत पुन्हा सरकारविरोधात दंड थोपटले आहेत.

    Lipi

    रहिम शेख, धाराशिव : मनोज जरांगे पाटील यांनी आज तुळजापुरातील तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद घेतले आहेत. तर तुळजाभवानी मंदिरातून त्यांनी सरकारला इशारा देखील दिला आहे. सरकार कुणाचेही असले तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, असे म्हणत पुन्हा सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. तसेच मराठा आंदोलनाची पुढील दिशा काय असणार याबाबतही भाष्य केले आहे.

    जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी येथून पुढील आंदोलन मुंबई येथे होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सामुहिक उपोषण करण्यात येणार आहे. सरकार कुणाचे ही असो मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, आरक्षणाची चळवळ काही थांबणार नाही, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे. जरांगे पाटील यांनी तुळजाभवानीचे आशीर्वाद घेतले आहेत. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
    शिंदेंच्या शिलेदाराचा विधानसभेत निसटता पराभव, जरांगेना भिडणारा माजी आमदार म्हणतो – मी वाघासारखा खंबीर
    यासोबतच जरांगे पाटलांनी निवडणुकीतील रणनीतीबाबतही मोठे विधान केले आहे. ‘महाराष्ट्रात मराठ्यांशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही. यावेळी मराठा समाजाने ओबीसी आमदार सुद्धा निवडून आणले आहेत. निवडणुकीदरम्यान मराठा, मुस्लिम, दलित हे समीकरण जुळलं नाही, नाहीतर मराठ्यांनी सुपडासाफ केला असता. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या फॉर्मुल्यात नव्हतो.’ असे जरांगे पाटलांनी अधोरेखित केले.

    विधानसभा निवडणुकीदरम्यान मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा, मुस्लिम, दलितांचे राजकीय समीकरण जुळवून उमेदवार देण्याचे ठरवले होते. परंतु या तिघांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे समीकरण अस्तित्वात आले नाही. तसेच जरांगे पाटील यांनी वारंवार सांगितले की, एका समाजावर आमदार निवडून येत नाहीत. त्यांना इतर समाजाची सुद्धा साथ लागते. जर मराठा बरोबर मुस्लिम दलित एकत्र आले तर अनेक उमेदवार निवडून येऊ शकतात म्हणून समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते जुळले नसल्याने ऐनवेळी जरांगेंनी माघार घेतली.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed