• Sat. Mar 7th, 2026

    ठाण्यावर भाजपचा दावा, शिवसेना पण तितकीच आग्रही, उमेदवार कोणत्या चिन्हावर हे गुलदस्त्यात!​​

    ठाण्यावर भाजपचा दावा, शिवसेना पण तितकीच आग्रही, उमेदवार कोणत्या चिन्हावर हे गुलदस्त्यात!​​

    प्रदीप भणगे, ठाणे : महायुतीचा ठाणे मतदारसंघातील उमेदवार कोण असेल याचा फैसला गुढी पाडव्याला होणार असल्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. विशेष म्हणजे ठाणे लोकसभेसाठी आमदार प्रताप सरनाईक यांचे नाव चर्चेत आहेत.अनेक जागांवर तिन्ही पक्षांकडून दावा ठोकण्यात येत असल्याने तेथे वाद कायम आहे, या वादांच्या जागांपैकी एक जागा म्हणजे ठाणे मतदारसंघ. ठाणे मतदारसंघावरून महायुतीचा तिढा कायम असून येत्या गुढी पाडव्याचा याचा तिढा सुटणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केले. गुढी पाडव्याला ठाणे लोकसभेचा महायुतीचा उमेदवार ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान महायुतीचा उमेदवार ठरविण्यात विलंब ठरत असल्याने अनेक नेत्यांची चिंता वाढू लागली आहे.

    ठाणे लोकसभेसाठी आमदार प्रताप सरनाईक यांचे नाव चर्चेत

    ठाणे लोकसभेचे विद्यमान खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे सोबत आहेत. तर ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदार संघापैकी बेलापूर, ऐरोली, ठाणे शहर या तीन मतदारसंघात भाजपचे आमदार असून कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजीवड्यात शिवसेनेचे आमदार आहेत. मिरा-भाईंदरमध्ये गीता जैन या अपक्ष आमदार आहे. त्यामुळे संपूर्ण लोकसभा मतदारसंघात भाजपचा प्रभाव मोठा असल्याने या मतदारसंघावरुन दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. मात्र ठाण्याची जागा शिंदेची शिवसेना लढवेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभेच्या जागेसाठी आमदार प्रताप सरनाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार रवींद्र फाटक यांचे नाव चर्चेत आहेत.
    राजकारण: राजन विचारेंच्या निष्ठेचा विजय होणार की शिंदेंचे उमेदवार बाजी मारणार, ठाण्यात प्रतिष्ठेची लढत

    उमेदवार कोणत्या चिन्हावर हे अद्याप गुलदस्त्यात

    दरम्यान, ठाकरे गटाच्या विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या विरोधात लढत देण्यासाठी तगडा उमेदवार द्यावा लागणार असल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनाच उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आता रंगू लागली आहे. मात्र ही ठाणे लोकसभा महायुती कोणत्या चिन्हावर लढतील हे गुलदस्त्यात आहे.

    लोकसभेत शिवसेना भाजपसाठी लढते, पण विधानसभेत घात होतो; स्मिता वाघ यांना उमेदवारी, शिवसेना जिल्हाप्रमुख नाराज

    पंतप्रधान मोदींच्या नावाने लढवणार निवडणूक

    ठाणे महायुतीचा गड आहे, आधीपेक्षा मोठ्या मताधिक्याने महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे. एक चेहरा समोर आहे तो म्हणजे नरेंद्र मोदींचा आणि तोच महत्वाचा आहे . स्थानिक पातळीवर निर्णय घेतला नसला तरी मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी काम करणार असल्याचे सरनाईक म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed